शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथे भगर खाल्याने ७५ जणांना विषबाधा

By मनोज शेलार | Updated: March 8, 2024 22:12 IST

४० जणांवर रनाळे ग्रामिण रुग्णालयात तर उर्वरित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नंदुरबार: महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी केेलेल्या भगरीच्या फराळातून तालुक्यातील घोटाणे येथे ७५ जणांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. ४० जणांवर रनाळे ग्रामिण रुग्णालयात तर उर्वरित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, तालुका आरोग्य विभागाकडून गावात रात्रीच सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून जिल्हा रुग्णालयाचे पथक घोटाणे व रनाळे येथे तळ ठोकून आहेत.घोटाणे येथे गावातील रहिवाशांनी एका ब्रॅण्डची भगर फराळसाठी खरेदी केली होती. भगर खाल्यानंतर सायंकाळी अनेकांना त्रास जाणवू लागला. अनेकांना मळमळ, उलट्या, जुलाबाचा त्रास होत होता. यामुळे तात्काळ रनाळे येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांनी धाव घेतली. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक नरेश पाडवी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.

रात्री ९ वाजेपर्यंत सुमारे ७५ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, यातील ४० जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते तर ५ ते ६ वृद्धांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. रात्री जिल्हा रुग्णालयाच्या पथकासह तालुका आरोग्य विभागाचे पथक रनाळा तसेच घोटाणे येथे तळ ठोकून होते. दरम्यान गावात आरोग्य विभागाकडून सर्वे करण्यात येत होता. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ.नरेश पाडवी यांनी दिली. याबाबत स्थानिक पोलिस यंत्रणेला देखील माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले.महाशिवरात्रीपूर्वी गावांमध्ये देण्यात आली होती दवंडी

गेल्या महिन्यात रनाळे येथे एका कार्यक्रमात भगरमधून भाविकांना विषबाधा झाल्याने आरोग्य प्रशासन यावेळी सतर्क झाले होते. यामुळे गावांमधून यापूर्वीच 'भगरपासून सावधान' असे सांगत दवंडी देवून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबार