शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

सोनवद येथील आगीत 70 हजारांचा कापूस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 16:43 IST

सोनवद येथील घटना : दुष्काळात जेमतेम आलेले उत्पन्नही गेले वाया

शहादा :  तालुक्यातील सोनवद येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिवाजी पुंडलिक पाटील यांच्या घरात असलेल्या 13 क्विंटल कापसाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागून बाजार भावाप्रमाणे 60 ते 70 हजार रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आग्निउपद्रवाची माहिती मिळताच नगरपालिकेचा अग्नीशामक बंब वेळेवर पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आग लागली तेव्हा घरी कोणीही नव्हते. शेतक:यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने आपला कापूस घरात व गोडाऊनमध्ये ठेवलेला आहे. सोनवद येथील शिवाजी पुंडलिक पाटील या कोरडवाहू शेतक:याने भाव वाढेल या आशेने कापूस आपल्या घरात भरून ठेवला होता. ते मंगळवारी स्वत:च्या खाजगी कामानिमित्त औरंगाबाद येथे गेले होते. थंडीचे दिवस असल्याने ग्रामीण भागात रात्री आठ वाजेनंतर शुकशुकाट होतो. बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास शिवाजी पाटील यांच्या घरात कापसाला आग लागल्याचे शेजा:यांना कळाल्याने या घराला कुलूप असल्याने ते तोडणे अवघड झाले होते. दरम्यान आगीने विद्रूप रूप धारण केले होते. आग विझविण्यासाठी गावातील दीपक पाटील, पंडित पाटील, ऋषिकेश पाटील, संजय पाटील, ईश्वर पाटील, जयवंत पाटील, चंद्रकांत पाटील, विकास पाटील, शरद पाटील, दिनेश पाटील, राहुल पाटील, मनोज न्हावी व ग्रामस्थांनी सहकार्य केले. दीपक पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिली. या वेळी अभिजित पाटील यांनी तातडीने नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देत सोनवद येथे घटनास्थळी पाठवले. गावात घर असल्याने अग्नीने पेट घेतल्यामुळे शेजारील घरांनाही त्याची झळ पोहचण्याची शक्यता असल्याने गावातील तरुण व ग्रामस्थांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझवण्यासाठी प्रय} केला. याप्रसंगी शहादा नगरपालिकेचा बंबदेखील वेळेवर पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. एकीकडे शेतक:यांच्या कापसाला भाव नसल्याने शेतकरी भाव वाढीच्या अपेक्षेने कापूस घरातच साठवून ठेवत आहे. शेत मालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, अनेक ठिकाणी साठवून ठेवलेल्या कापसाला आग लागल्याच्या घटना घडत आहे. यात शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतक:यांच्या शेती मालाला भाव नसल्याने शेती करावी की, नाही हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.शेतक:यांच्या मालाचा कृषी विभागाचे विम्याचे कवच असेल तर शेतक:यांना तातडीची मदत करावी, अशी मागणी होत आहे.