शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

नंदुरबार आगाराला ६० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बसेस बंद असल्याने गेल्या सहा दिवसात राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराला ...

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बसेस बंद असल्याने गेल्या सहा दिवसात राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराला तब्बल ६० लाख रुपयांचा फटका बसला आहे. ५२२ पैकी ५०० फेऱ्या बंद असल्याने आगाराला या नुकसानीची झळ सोसावी लागत आहे.

नंदुरबार शहरासह जिल्हाभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आता कोणत्याही भागात नजर फिरवली तर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात १ ते १५ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या काळात सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. दुपारी एकनंतर संपूर्णपणे बंद पाळण्यात येत आहे.

या दरम्यान नंदुरबार आगाराच्या बसेसदेखील बंद ठेवण्याचा निर्णय आगाराने वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेतला आहे. त्याची १ एप्रिलपासून अंमलबजावणीही करण्यात येत आहे.

नंदुरबार आगाराच्या दिवसभरात एकूण ५२२ फेऱ्या होतात. आगार बंद असल्याने यातील ५०० फेऱ्या पूर्णपणे बंद आहेत. केवळ २२ फेऱ्या सुरू आहेत. यात जिल्हाअंतर्गत बसेस कार्यान्वित आहेत. यात तळोदा, अक्कलकुवा, शहादा, नवापूर, धडगाव याच बसेस सुरू आहेत. बंद असलेल्या ५०० फेऱ्यांमुळे नंदुरबार आगाराला प्रति दिनी साधारण १० लाख रुपयांचा फटका बसत आहे. याचा विचार केला तर १ ते ६ एप्रिल दरम्यान नंदुरबार आगाराचे सहा दिवसात तब्बल ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.