शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यातील यात्रेत मसाला खरेदी-विक्रीतून ५० लाखांची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:04 IST

तळोदा : तळोदा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवानिमित्त मसालाबाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे़ मसाल्यांच्या खरेदी-विक्रीतून आतापर्यंत जवळपास ५० ...

तळोदा : तळोदा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवानिमित्त मसालाबाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे़ मसाल्यांच्या खरेदी-विक्रीतून आतापर्यंत जवळपास ५० लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती आहे़तळोदा येथील यात्रेत्सवातील मसाला बाजार प्रसिध्द आहे़ आजच्या काळात मसाले तिखट, धने, जिरे, हळद व इतर वस्तू रेडीमेट व आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत़ विविध कंपन्या या क्षेत्रात आजच्या काळात बाजारात उतरलेल्या आहेत़ परंतु येथील यात्रेत वर्षाला लागणारा मसाला आवडीप्रमाणे व आवश्यकतेनुसार विकत घेऊन दळून घेण्याची पध्दत अनेक वर्षांपासून सुरु आहे़ आजही गृहिणी येथील मसाल्यांनाच अधिक पसंती देत असतात़ या यात्रेत मसाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपली दहाहून अधिक दुकाने लावली आहेत़ प्रत्येक व्यावसायिक साधारणत: यात्रेत पाच ते सहा लाख रुपयांची उलाढाल करीत असतो़ यात्रेत एकंदरीत ५० लाखांपर्यंत उलाढाल झाल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे़ सध्या सुरु असलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यामुळे मसाल्याच्या भावात काहीशी वाढ झालेली दिसून येत आहे़ दरम्यान, महिलांकडून खडा मसाला, खोबरे, तिखट मिरची, हळद आदींना चांगली मागणी आहे़ लोणच्याचा तयार मसालाही गृहिणी यात्रेत खरेदी करणे पसंत करतात़ सर्व मिश्र मसाला १५० ते २०० रुपये किलो, हळद १२० ते १६० रुपये किलो, जिरे २२० ते २४० रुपये किलो, धने १२० ते १६० रुपये किलो, खोबरे २२० ते २४० रुपये किलो, लाल मिरची तिखट १४० ते १६० रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती येथील मसाल्याचे व्यापारी हाजी जाकीर हाजी गनी, हाजी शाकीर हाजी गनी या व्यापारी बंधुंकडून देण्यात आली़बैलबाजार तेजीतदरम्यान, यात्रेनिमित्त भरविण्यात येणाºया बैल बाजारातही आतापर्यंत १ कोटी २१ लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे़ यात्रोत्सवानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कृषी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते़ दरवर्षाप्रमाणे याही वर्षी बैलबाजारात खरेदी-विक्री जोमात होती़ दरम्यान, बैल बाजारात या वर्षी विक्रीसाठी १ हजार २०० बैल आले होते़ त्यातून ९८० बैलांची विक्री करण्यात आली़ त्या बैैलबाजारात महाराष्ट्राबरोबरच शेजारील गुजरात, मध्यप्रदेश राज्यातूनही आलेल्या बैलांची मोठ्या संख्येने खरेदी-विक्री झाली होती़ दरम्यान, आपल्या पशुधनाला घेऊन आलेल्या पशुपालकांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सर्व सोयीसुविधा करण्यात आल्या होत्या़