शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळ्यात १३ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : गुजर समाज मंचतर्फे गुरुवारी मनरद, ता.शहादा येथे समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा तिसरा सामूहिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : गुजर समाज मंचतर्फे गुरुवारी मनरद, ता.शहादा येथे समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा तिसरा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात १३ जोडप्यांचे शुभमंगल समाजाच्या प्रथेनुसार लावण्यात आले. या सोहळ्याला सुमारे १० हजार समाज बांधव उपस्थित होते. हा सोहळ्यातील विवाह ठरलेल्या मुहूर्तावर लावण्यात आला.मनरद गावाजवळील पटांगणामध्ये प्रशस्त मंडप टाकण्यात आला होता. दर्शनी भागात लावलेले लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांचे बॅनर लक्ष वेधून घेत होते. तसेच विवाह सोहळ्याचा परिसर फुले व रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता.  या वेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, कमलताई पाटील, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, जयश्री दीपक पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माधव जंगू पाटील, ईश्वर भूता चौधरी, व्हीएसजीजीएमचे प्रमुख मोहन पटेल, जि.प.चे माजी सभापती डॉ.भगवान पाटील, के.डी. पाटील, गुजर समाज मंचचे अध्यक्ष श्रीपत पाटील, उपाध्यक्ष हरी दत्तू पाटील, मध्य प्रदेश गुजर  समाजाचे अध्यक्ष विश्वासराव देसले,  देवनारायण सेना,  शैलेंद्रसिंग गुजर, निझरचे मणिलाल पटेल, प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी, सुरत जिल्हा बँकेचे संचालक सुनील पाटील, सुमूल डेअरीचे भरत पटेल आदी उपस्थित उपस्थित होते. सजवलेल्या पाच ट्रॅक्टर ट्रॉलीवर वरांची वाजत-गाजत वरात काढण्यात आली. वधूंनादेखील सजविलेल्या लक्झरीमध्ये लग्नमंडपात आणण्यात आले. प्रत्येक वर-वधूसाठी स्वतंत्र असे १३ स्टेज उभारण्यात आले होते. स्वतंत्र स्टेजवर वर व वधू यांना बसवून त्यांच्यासमोरच त्यांच्याकडील वºहाडी मंडळीसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. भागवतकार अविनाश जोशी व ह.भ.प. वसंत महाराज यांनी  मंगलअष्टके म्हटली. लग्न वेळेवर म्हणजे दहा वाजून पाच मिनिटांनी लावण्यात आले. विवाहानंतर सर्व वर-वधूंना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र जागेवरच मनरदचे उपसरपंच संजय पाटील व ग्रामसेवक उमेश जाधव यांनी दिले. सामूहिक विवाह सोहळ्यास आलेल्या वºहाडींना भोजनासाठी महिला व पुरुष यांच्यासाठी दोन वेगळे मंडप टाकण्यात आले होते. भोजनासाठी प्लॅस्टीकच्या साहित्याचा वापर टाळण्यात आला. प्रास्ताविक हरी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शरद पाटील व सेजल रविकांत पटेल तर आभार आय.डी. पटेल व डी.सी. पाटील यांनी मानले.सामूहिक विवाह सोहळ्यासाठी सुरत येथील विश्व कल्याण ग्रुपतर्फे ५० वृक्षांची रोपे भेट देण्यात आले. नववधू-वरांच्या हस्ते या रोपांचे मनरद येथील लाभदायक विद्यामंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यातून निसर्ग जपण्याचा संदेश देण्यात आला. तसेच विश्व कल्याण ग्रुपतर्र्फेेच प्रत्येक वर-वधूंना भगवतगीता भेट देण्यात आली.४विवाह सोहळ्यामध्ये अनुचित प्रकार घडल्यास दवाखाना, डॉक्टरांची टीम, अ‍ॅम्बुलन्स, तज्ज्ञ डॉक्टर, मोबाईल स्वच्छालय,  अग्निशमन दल आदींची व्यवस्था करण्यात आली होती.बुधवारपासून विवाह सोहळ्याच्या ठिकाणी मनरद, करजई व लांबोळा येथील भगिनींनी हजेरी लावली. त्यांनी स्वत: आंब्याच्या पानांपासून तोरण झेंडूची फुले गुंफून त्यापासून माळ तयार केली होती. ट्रॅक्टरला सजवण्यासाठी फुलांच्यामाळा त्यांनी तयार केल्या होत्या. तसेच वधू सासरी जाताना जे लाडू देतात तेदेखील त्यांनी स्वत:च बांधून तयार केले होते. लग्नसोहळा आटोपल्यावर परिसरामध्ये स्वच्छता राहावी यासाठी स्वत: परिसर स्वच्छ  केला हे विशेष कौतुक करण्यासारखे आहे.