शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

४५ वनजमीनधारकांना जमिनीचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 13:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील सोरापाडा येथे बुधवारी ४५ वनअतिक्रमणधारकांना त्यांच्या जमिनीच्या ताबा पावत्या येथील महसूल प्रशासनाकडून देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील सोरापाडा येथे बुधवारी ४५ वनअतिक्रमणधारकांना त्यांच्या जमिनीच्या ताबा पावत्या येथील महसूल प्रशासनाकडून देण्यात आल्या. याप्रसंगी गेल्या ४० वर्षाच्या लढ्यानंतर प्रत्यक्ष जमिनींचे कागदपत्र मिळाल्याने या वनपट्टेधारकांनी आनंद व्यक्त केला होता. दरम्यान जे प्रलंबीत दावे आहेत त्यावरही तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा वनजमीन अतिक्रमणधारकांनी केली आहे. जिल्ह्यातील दाव्यांपैकी अजूनही २६ हजार दावे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.येथील महूसल प्रशासना व पिंपरपाडा वनसमिती यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदा तालुक्यातील सोरापाडा येथे बुधवारी संबंधितांचे वनजमिनींचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते डाॅ.कांतीलाल टाटीया, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, उपविभागीय वनसमितीचे सदस्य दाज्या पावरा, पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, छगन कोठारी, यशवंत पाडवी, सरपंच वासुदेव वळवी, माजी सरपंच नारायण ठाकरे, नायब तहसीलदार बी.व्ही. अहिरराव, मंडळ अधिकारी एस.एम. पाडवी, सुरेश भांगा पाडवी, वीरसिंग पाडवी, नारायण बागले, वासुदेव नाईक, गुड्डू वळवी, तलाठी एस.वाय. जठारे उपस्थित होते. याप्रसंगी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते परिसरातील ४५ वनजमीन अतिक्रमणधारकांना आपल्या जमिनीचा मालकी हक्क देण्यात आल्याने ते भारावले होते. या वेळी आमदार पाडवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अतिक्रमणधारकांनी ते दावे प्रशासनाने दाखल केले आहे. त्याबाबतची कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करावी. जेणे करून त्यात कुठल्याही प्रकारची त्रुटीराहणार नाही. ज्या-ज्या ठिकाणी वनदाव्यांबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यांची संपूर्ण माहिती मी घेतली आहे. साधारण ७६० हेक्टर जमीन महसुली झाली आहे. यावरील पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभाग व उपमुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून प्रत्यक्ष शिष्ट मंडळच नेणार आहे, असे सांगून माझ्या राहिलेल्या कालावधीत शहादा-तळोदा तालुक्यातील संपूर्ण वनजमीन अतिक्रमणधारकांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी डाॅ.कांतीलाल टाटीया, नागेश पाडवी, यशवंत पाडवी, दाज्या पावरा यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पिंपरपाडा वनसमितीचे अध्यक्ष कांतीलाल पाडवी यांनी केले. सूत्रसंचालन कांतीलाल वळवी तर आभार लक्ष्मण पाडवी यांनी मानले.