शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील 44 गावे यंदाही टंचाईने होरपळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणा:या सर्वाधिक 77 गावांपैकी नंदुरबार तालुक्यातील निम्मेपेक्षा अधीक अर्थात 44 गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे प्रामुख्याने नेहमीच अवर्षण प्रवण राहिलेल्या पूर्व भागातील आहेत. यंदा या गावांमध्ये टंचाई निवारणार्थ 70 लाखांपेक्षा अधीकची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. दरम्यान, जलयुक्तसह इतर जलसंधारणाची जास्तीत जास्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणा:या सर्वाधिक 77 गावांपैकी नंदुरबार तालुक्यातील निम्मेपेक्षा अधीक अर्थात 44 गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे प्रामुख्याने नेहमीच अवर्षण प्रवण राहिलेल्या पूर्व भागातील आहेत. यंदा या गावांमध्ये टंचाई निवारणार्थ 70 लाखांपेक्षा अधीकची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. दरम्यान, जलयुक्तसह इतर जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे या भागात घेवून कायमची टंचाई घालवावी अशी अपेक्षा या भागातील ग्रामस्थांमधून होत आहे.नंदुरबार तालुक्यात यंदा सरासरीचा 90 टक्केपेक्षा अधीक पाऊस झाला आहे. परंतु या पावसाचे प्रमाण हे पश्चिम व उत्तर भागात अधीक आहे. त्यामानाने पूर्व भाग यंदाही कोरडाच राहिला. परतीच्या पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला होता. परंतु तोर्पयत पीक हातातून गेले होते, रब्बीला थोडाफार फायदा झाला. परंतु पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम राहिली आहे. हा भाग नेहमीच अवर्षणप्रवण राहिला आहे. यंदाही तीच परिस्थिती राहणार आहे.तब्बल 44 गावेयंदा तालुक्यातील तब्बल 44 गावे टंचाईग्रस्त घोषीत करण्यात आली आहेत. या गावांमध्ये पहिल्या सत्रात खोडसगाव, कोळदे, रनाळे, आडछी, घोटाणे, सातुर्खे व काकर्दे या गावांचा समावेश आहे. द्वितीय सत्रातील उपाययोजनांमध्ये निंबोणी बुद्रूक, वेळावद, लहान शहादा, भालेर, होळतर्फे हवेली, कलमाडी, आराळे, सैताणे, बलवंड, धुळवद, कानळदे, उमर्दे बुद्रूक, खैराळे, घुली, जुने सोनगीर, भादवड, आसाणे, मांजरे, कार्ली, खर्देखुर्द, बह्याणे, रनाळेखुर्द या गावांचा तर तृतीय सत्रात कोठारे दिगर, दहिंदुले बुद्रूक, ढंढाणे, नळवेखुर्द, न्याहली, पळाशी, रजाळे, राकसवाडे, शिंदे, वरूळ, शिंदगव्हाण, तलवाडे बुद्रूक, इंद्रीहट्टी, तिसी, शिवपूर, जुनमोहिदा, ओसर्ली, बामडोद, करणखेडा, वसलाई, पथराई, धमडाई व कोठडा या गावांचा समावेश राहणार आहे. विहिर अधिग्रहण44 गावांमध्ये पहिल्या सत्रात चार गावांमध्ये खाजगी विहिर व कुपनलिका अधिग्रहीत करण्यात आल्या. द्वितीय सत्रात 21 गावांमध्ये विहिरी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. तर तृतीय सत्रात देखील 21 गावांमध्ये विहिर व विंधनविहिर अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. याशिवाय विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती, विंधन विहिरी घेणे, तात्पुरत्या पुरक नळ योजना आदी कामे घेण्यात येणार आहेत. नेहमीचीच समस्यानंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग नेहमीच अवर्षण प्रवण राहिला आहे. यंदाही तीच समस्या कायम आहे. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशसनाने गेल्या दोन वर्षापासून या भागात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त गावांची निवड केलेली आहे. यंदा देखील अनेक गावे घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे येत्या काळात या भागातील चित्र बदलेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याबरोबरच ग्रामस्थांनी देखील पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी उपक्रम राबवावे, जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे देखील आवश्यक आहे. तरच हा भाग अवर्षण प्रवणपासून मुक्ती मिळवेल.सिंचन क्षमता वाढणारतापी-बुराई उपसा योजनेअंतर्गत निंभेल तलावाची साठवण क्षमता 7.05 दशलक्ष घनमीटर, आसाने तलावाची 13.69 दशलक्ष घनमिटर, शनिमांडळ तलावाची 2.07 दशलक्ष घनमीटर तर बुराई प्रकल्पाची 18.66 दशलक्ष घनमिटर इतकी आहे. एकूण साठवण क्षमता 41.47 दशलक्ष घनमिटर इतकी राहणार आहे. कामाअंतर्गत निंभेल व आसाणे येथे साठवण तलाव बांधणे प्रस्तावीत आहे. यामुळे या भागातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय शेती सिंचनाची देखील व्यवस्था होणार आहे.