शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

नंदुरबारातील 44 गावे यंदाही टंचाईने होरपळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणा:या सर्वाधिक 77 गावांपैकी नंदुरबार तालुक्यातील निम्मेपेक्षा अधीक अर्थात 44 गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे प्रामुख्याने नेहमीच अवर्षण प्रवण राहिलेल्या पूर्व भागातील आहेत. यंदा या गावांमध्ये टंचाई निवारणार्थ 70 लाखांपेक्षा अधीकची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. दरम्यान, जलयुक्तसह इतर जलसंधारणाची जास्तीत जास्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणा:या सर्वाधिक 77 गावांपैकी नंदुरबार तालुक्यातील निम्मेपेक्षा अधीक अर्थात 44 गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे प्रामुख्याने नेहमीच अवर्षण प्रवण राहिलेल्या पूर्व भागातील आहेत. यंदा या गावांमध्ये टंचाई निवारणार्थ 70 लाखांपेक्षा अधीकची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. दरम्यान, जलयुक्तसह इतर जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे या भागात घेवून कायमची टंचाई घालवावी अशी अपेक्षा या भागातील ग्रामस्थांमधून होत आहे.नंदुरबार तालुक्यात यंदा सरासरीचा 90 टक्केपेक्षा अधीक पाऊस झाला आहे. परंतु या पावसाचे प्रमाण हे पश्चिम व उत्तर भागात अधीक आहे. त्यामानाने पूर्व भाग यंदाही कोरडाच राहिला. परतीच्या पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला होता. परंतु तोर्पयत पीक हातातून गेले होते, रब्बीला थोडाफार फायदा झाला. परंतु पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम राहिली आहे. हा भाग नेहमीच अवर्षणप्रवण राहिला आहे. यंदाही तीच परिस्थिती राहणार आहे.तब्बल 44 गावेयंदा तालुक्यातील तब्बल 44 गावे टंचाईग्रस्त घोषीत करण्यात आली आहेत. या गावांमध्ये पहिल्या सत्रात खोडसगाव, कोळदे, रनाळे, आडछी, घोटाणे, सातुर्खे व काकर्दे या गावांचा समावेश आहे. द्वितीय सत्रातील उपाययोजनांमध्ये निंबोणी बुद्रूक, वेळावद, लहान शहादा, भालेर, होळतर्फे हवेली, कलमाडी, आराळे, सैताणे, बलवंड, धुळवद, कानळदे, उमर्दे बुद्रूक, खैराळे, घुली, जुने सोनगीर, भादवड, आसाणे, मांजरे, कार्ली, खर्देखुर्द, बह्याणे, रनाळेखुर्द या गावांचा तर तृतीय सत्रात कोठारे दिगर, दहिंदुले बुद्रूक, ढंढाणे, नळवेखुर्द, न्याहली, पळाशी, रजाळे, राकसवाडे, शिंदे, वरूळ, शिंदगव्हाण, तलवाडे बुद्रूक, इंद्रीहट्टी, तिसी, शिवपूर, जुनमोहिदा, ओसर्ली, बामडोद, करणखेडा, वसलाई, पथराई, धमडाई व कोठडा या गावांचा समावेश राहणार आहे. विहिर अधिग्रहण44 गावांमध्ये पहिल्या सत्रात चार गावांमध्ये खाजगी विहिर व कुपनलिका अधिग्रहीत करण्यात आल्या. द्वितीय सत्रात 21 गावांमध्ये विहिरी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. तर तृतीय सत्रात देखील 21 गावांमध्ये विहिर व विंधनविहिर अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. याशिवाय विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती, विंधन विहिरी घेणे, तात्पुरत्या पुरक नळ योजना आदी कामे घेण्यात येणार आहेत. नेहमीचीच समस्यानंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग नेहमीच अवर्षण प्रवण राहिला आहे. यंदाही तीच समस्या कायम आहे. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशसनाने गेल्या दोन वर्षापासून या भागात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त गावांची निवड केलेली आहे. यंदा देखील अनेक गावे घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे येत्या काळात या भागातील चित्र बदलेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याबरोबरच ग्रामस्थांनी देखील पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी उपक्रम राबवावे, जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे देखील आवश्यक आहे. तरच हा भाग अवर्षण प्रवणपासून मुक्ती मिळवेल.सिंचन क्षमता वाढणारतापी-बुराई उपसा योजनेअंतर्गत निंभेल तलावाची साठवण क्षमता 7.05 दशलक्ष घनमीटर, आसाने तलावाची 13.69 दशलक्ष घनमिटर, शनिमांडळ तलावाची 2.07 दशलक्ष घनमीटर तर बुराई प्रकल्पाची 18.66 दशलक्ष घनमिटर इतकी आहे. एकूण साठवण क्षमता 41.47 दशलक्ष घनमिटर इतकी राहणार आहे. कामाअंतर्गत निंभेल व आसाणे येथे साठवण तलाव बांधणे प्रस्तावीत आहे. यामुळे या भागातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय शेती सिंचनाची देखील व्यवस्था होणार आहे.