शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

आगीत होरपळून 35 जनावरांचा मृत्यू माळखुर्द येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गोठय़ात लावलेल्या चिमणीचा भडका उडून लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक           झाले. गोठय़ात बांधलेली 35 जनावरे या आगीत मृत्युमुखी पडले. याशिवाय 32 हजारांची रोकडसह 90 क्विंटल धान्य व संसारोपयोगी वस्तू जळाल्यात. साधारण पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत मानवहानी ...

ठळक मुद्देकर्मचा:यांनी पायपीट करीत केला पंचनामा घराला लागलेल्या आगीच्या घटनेची माहिती फुलसिंग वसावे यांनी तालुका प्रशासनास कळविल्यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तातडीने तलाठी डी.बी. हाडे, पशुवैद्यकीय अधिकारी सुनील गोस्वामी व इतर कर्मचा:यांना पंचनाम्यासाठी पाठवि

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गोठय़ात लावलेल्या चिमणीचा भडका उडून लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक           झाले. गोठय़ात बांधलेली 35 जनावरे या आगीत मृत्युमुखी पडले. याशिवाय 32 हजारांची रोकडसह 90 क्विंटल धान्य व संसारोपयोगी वस्तू जळाल्यात. साधारण पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत मानवहानी झाली नाही. ही घटना तालुक्यातील अतिदुर्गम भागातील माळखुर्द या पाडय़ात घडली.मिळालेल्या माहितीनुसार तळोदा तालुक्यातील माळखुर्द या पाडय़ातील फुलसिंग रामा वसावे यांच्या घराजवळील गोठय़ात रात्री चिमणी लावली होती. या चिमणीचा             भडका रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास उडाला. त्यात आगीने पेट घेतल्याने गोठय़ा बरोबरच घराला आग लागली. या आगीत संपूर्ण गोठा व घरही जळून खाक झाले. या वेळी गोठय़ात बांधलेली चार बैले, एक दुधाळ गाय, एक गो:हा, 15 शेळ्या, 15 कोंबडय़ा अशी 35 पाळीव जनावरे त्याच बरोबर 90 क्विंटल धान्य. यात भगर, ज्वारी, भुईमूग, तुवर दाळीचा समावेश होता. याशिवाय कपाटात ठेवलेली 32 हजारांची रोकड व संसारोपयोगी वस्तूही जळून खाक झाल्या आहे. शेतात एकांतात घर असल्यामुळे आजू-बाजूचे रहिवाशी आग विझविण्यास येईपावेतो संपूर्ण    पाळीव प्राणी आगीच्या भस्मात मृत्यूमुखी पडले होते. सुदैवाने या दुर्घटनेत मुनष्यहाणी झाली नाही.  मात्र आपल्या डोळ्यादेखत मोठय़ा कष्टाने कमवलेली कमाई अन् पाळीव जनावरे आगीत भस्म झाल्याने फुलसिंग वसावे यांनी अक्षरश: हंबरडा फोडला होता. त्यांचा संसार उघडय़ावर आल्याने शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.