शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

नंदुरबारातील 31 हजार शेतकरी मदतनिधीच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 12:38 IST

बोंडअळीची बाधा : शासनाकडून 29 कोटी रूपयांचा निधी रखडला

नंदुरबार : जिल्ह्यात बोंडअळीमुळे 85 हजार शेतकरी बाधित झाले होत़े यातील 54 हजार 817 शेतक:यांना शासनाने मदत वाटप केली असल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आह़े परंतू अद्यापही 31 हजार शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असून गेल्या दोन आठवडय़ांपासून शासनाने जिल्हा प्रशासनाला 29 कोटी रूपयांची रक्कम वर्ग केलेली नसल्याने मदतीसाठी शेतकरी बँका आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत़नंदुरबार जिल्ह्यातील शेतक:यांसाठी शासनाने 89 कोटी 65 लाख 22 हजार रूपयांची मदत जाहिर केली होती़ ही मदत जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतक:यांना देण्यात येणार होती़ यानुसार गेल्या मे महिन्यापासून वाटपाचे कामकाज सुरू होत़े परंतू पाच महिने उलटूनही केवळ 54 हजार शेतक:यांनाच मदत मिळू शकलेली आह़े शासनाने दिलेला सर्व निधी वाटप झाल्यानंतर तात्काळ उर्वरित शेतक:यांसाठीचा निधी देणे गरजेचे असतानाही दोन आठवडे उलटूनही प्रशासनाला रक्कम प्राप्त झालेली नाही़ याचा परिणाम म्हणजे गेल्या दोन आठवडय़ांपासून शेतक:यांची फिरफिर सुरू झाली आह़ेबहुतांश शेतक:यांना मदत मिळाली असल्याने अनेकांनी तलाठी आणि तहसीलदार कार्यालयात तगादा लावला आह़े येत्या आठवडाभरात जिल्हाधिकारी कार्यालयात उर्वरित 31 हजार शेतक:यांसाठी जाहिर झालेली 29 कोटी 89 लाख 22 हजार 145 रूपयांची रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आह़े परंतू ठोस अशी माहिती नसल्याने त्यापुढील आठवडा उजाडण्याची स्थिती निर्माण झाल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आह़े जिल्ह्यात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या 95 हजार 802 हेक्टर क्षेत्रापैकी 65 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू असल्याने तेथील शेतक:यांचा गेल्या वर्षाचा खरीप हंगाम हाताच गेला होता़ यंदाही पावसाने मेहेरनजर न दाखवल्याने पुन्हा दुष्काळी स्थितीचा सामना शेतक:यांना करावा लागत आह़े यात शासनाकडून प्रतीहेक्टर मिळणारी 6 हजार 800 ही रक्कम दिलासा देणारी ठरणारी होती़ गत चार महिन्यात शेतक:यांना मिळालेल्या रकमेमुळे अनेकांनी पुन्हा शेतीतच गुंतवणूक करत कापूस लागवड केला होता़ परंतू गत दोन आठवडय़ात रकमेचे वाटप थांबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ कार्यालये आणि बँकांमध्ये भेटी देणा:या शेतक:यांच्या प्रश्नांना उत्तरे देता-देता अधिकारी कर्मचा:यांच्या नाकीनऊ आले आह़े नंदुरबार तालुक्यात आजअखेरीस 16 हजार 719 शेतक:यांना 21 कोटी 85 लाख 6 हजार 754 रूपयांची मदत वाटप झाली आह़े तालुक्यात 10 कोटी 92 लाख 53 हजार 379 रूपयांचे वाटप शिल्लक आह़ेनवापूर तालुक्यात 9 हजार 271 शेतक:यांना 5 कोटी 16 लाख 47 हजार 324 रूपयांचे वाटप करण्यात आले आह़े याठिकाणी अद्यापही 2 कोटी 87 लाख 4 हजार 816 रूपयांची मागणी आह़े अक्कलकुवा तालुक्यात 2 हजार 69 शेतक:यांना आजवर 97 लाख 80 हजार 802 रूपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आह़े येथे अद्याप 48 लाख 90 हजार 604 रूपयांच्या निधीची प्रतिक्षा आह़े सर्वाधिक 43 कोटी 92 लाख 49 हजार 618 मदत शहादा तालुक्यात जाहिर झाली होती़ यातील केवळ 29 कोटी 28 लाख 33 हजार 78 रूपये शासनाला प्राप्त झाले असून 24 हजार 159 शेतक:यांना ही मदत मिळाली आह़े या तालुक्यातून 14 कोटी 64 लाख 16 हजार 540 रूपयांची मागणी आह़े तळोदा तालुक्यात 2 हजार 107 शेतक:यांना 22 कोटी  49 लाख 94 रूपयांची मदत वाटप झाली असली तरी येथेही अद्याप 1 कोटी 12 लाख 45 हजार 48 रूपयांची गरज आह़े सर्वाधिक कमी 492 शेतकरी संख्या असलेल्या धडगाव तालुक्यात 22 लाख 39 हजार 640 रूपयांची मदत वाटप करण्यात आली आह़े येथे 12 लाख 41 हजार 960 रूपयांची गरज आह़े