शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

५२ हजार शेतकऱ्यांना तिसºया टप्प्यातील ‘सन्मान’ची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:45 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याच्या ९५० गावांमधून संकलित करण्यात आलेल्या १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांची नावे जिल्हा ...

 

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याच्या ९५० गावांमधून संकलित करण्यात आलेल्या १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांची नावे जिल्हा प्रशासनाने पीएम-किसान पोर्टलवर फेब्रुवारी अखेरीस वर्ग केली होती़ यापैकी केवळ ५२ हजार शेतकºयांना पहिल्या दोन टप्प्यातील रकमेचा लाभ झाला असून उर्वरित १ लाख २० हजार शेतकरी योजनेपासूनच वंचित आहेत़पहिल्या दोन टप्प्यातील रक्कम मिळाल्यानंतर शेतकºयांना शेवटच्या टप्प्यातील रकमेची प्रतिक्षा होती़ परंतू बºयाच शेतकºयांच्या आधार कार्ड आणि बँक खातेक्रमांक यांच्यात दुरुस्त्या असल्याने त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास अडचणी येत होत्या़ परिणामी प्रशासनाने जिल्ह्यात सुरु असलेल्या २५७ कॉमन सर्व्हिस सेंटर चालकांना प्रशिक्षण देत शेतकºयांची नावे दुरुस्ती करुन घेण्याचे आदेश काढले आहेत़ याठिकाणी गेल्यानंतर शेतकºयांनी पीएम किसान पोर्टलवर जाऊन किसान योजनेसंबधी लिंक ओपन करुन आधार क्रमांक टाकून तपासणी करावयाची आहे़ आधारकार्ड प्रमाणे नाव आहे किंवा कसे हे तपासून घेत दुरुस्ती असल्यास ते अपडेट करुन घ्यावयाचे आहे़ दुरुस्ती असल्यास तहसील कार्यालयातील दुरुस्ती केंद्रात दुरुस्ती करुन देण्यात येणार आहे़ दुरुस्ती प्रक्रिया व नवीन नोंदणीसाठी लाभार्थीला नाममत्र शुल्क लाभार्थीला द्यावे लागणार आहे़ याप्रक्रियेनंतर शेतकºयांच्या खात्यावर वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़यानुसार कामकाजाला गती मिळाली असून उर्वरित काळात सर्वच शेतकºयांची नावे पीएम-किसान पोर्टलवर पुन्हा नव्याने वर्ग होऊन त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे़ ५२ हजार शेतकºयांना पहिल्या दोन टप्प्यात रक्कम मिळाली असताना जिल्ह्यातील १ लाख २० हजार शेतकºयांनाही आधार आणि बँक खाते संदर्भातील त्रुट्या पीएम किसान पोर्टलवर दिसून येणार आहेत़ या दुरुस्त्या तातडीने झाल्यानंतर या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम वर्ग होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे़४जिल्ह्यात नमुना आठ नुसार १ लाख ७६ हजार ५९५ शेतकरी आहेत़ फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या ग्रामस्तरीय समित्यांनी ७२ हजार ७७१ कुटूंबांचे सर्वेक्षण पूर्ण केले होते़ या कुटूंबांच्या प्रमुखाच्या खात्यावर तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्याचे निर्धारित करण्यात आले होते़ परंतू आजअखेरीस केवळ ५२ हजार शेतकºयांच्या खात्यावर पहिल्या आणि दुसºया टप्प्याचे अनुदान वर्ग झाले आहे़४शासनाच्या सर्वेक्षणानुसार नंदुरबार तालुक्यात १५५ गावांमध्ये ४० हजार २२१ शेतकरी़४नवापुर तालुक्यात १६५ गावांमध्ये ४१ हजार ३५२ शेतकरी़४शहादा तालुक्यातील १८० गावांमध्ये ५१ हजार ६८९ शेतकरी़४तळोदा तालुक्यात ९४ गावात १६ हजार ९१९ शेतकरी़४अक्कलकुवा तालुक्यात १९४ गावांत १९४ गावांमध्ये १५ हजार ५६९ शेतकरी़४धडगाव तालुक्यात १६२ गावांमधील १० हजार ८५५ शेतकºयांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते़४सर्वेक्षणानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस काहींच्या पहिल्या टप्प्यातील २ हजार रुपयांची रक्कम वर्ग झाली होती़ काही काळानंतर यातील काहींना दुसºया टप्प्यातील रक्कम मिळाली होती़१ लाख २० हजार ५९५ शेतकरी लाभार्थींच्या नोंदण्या होवूनही त्यांना किसान सन्मान योजनेतून मदत न मिळाल्याने त्यांच्याकडून सातत्याने तहसील कार्यालय, तलाठी, मंडळाधिकारी यांच्या भेटी घेण्यात येत आहेत़ बºयाच शेतकºयांची नावे, आधार कार्ड आणि बँकेची माहिती ही योग्य असल्याचा दावा करण्यात येत आहे़ यातून सर्वेक्षण नोंदणी दरम्यान चुकीची माहिती दिली गेली असावी असे शेतकºयांचे म्हणणे आहे़ यामुळे प्रशासनाने सर्वेक्षण कार्यक्रमाची माहिती घेऊन दुरुस्त्या करुन घ्याव्यात असे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़