लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून अवकळा आलेल्या तळोद्याच्या बैलबाजारास काहीअंशी भरभराट आली आहे. कारण शुक्रवारच्या बाजारात साधारण १५० बैलांची आवक होऊन जवळपास ३० लाखांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजारात थोडीफार तेजी आल्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच बाजार समितीच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत.गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्ण जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यभरात लॉकडाऊन सुरू केले होते. मात्र या लॉकडाऊनमध्ये शासनाने थोडी शिथिलता दिली आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनानेदेखील राज्य शासनाच्या सूचनेवरून व शेतकऱ्यांचा खरीप हंगाम लक्षात घेऊन बैल बाजार भरणाºया जिल्ह्यातील बाजार समित्यांना शासनाच्या नियमांचे पालन करून गेल्या २३ मे पासून बैल बाजार भरण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार तळोदा बाजार समितीने आपल्या बाजार समितीच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगची आखणी करत बैल बाजाराचे नियोजन केले होते. परंतु बैल व्यापाºयांनी कोरोनाची भिती व वाहतुकीची अडचण यामुळे गेल्या दोन बाजारापासून तळोद्याच्या बैल बाजाराकडे पाठ फिरविली होती. शिवाय बाजार समितीच्या कर्मचाºयांमध्येही चिंतेचे सावट होते. तथापि बाजार समिती प्रशासनाने नियमितपणे विक्रीसाठी येणाºया बैल व्यापाºयांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत बैल विक्रीसाठी आणण्याची विनंती केली. शिवाय भयमुक्त वातावरणाची हमी दिली. कर्मचाºयांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन व्यावसायिकांनी शुक्रवारच्या बैल बाजारात आपली बैले विक्रीसाठी आणली होती. साधारण १५० बैलांची आवक झाली होती. यातून साधारण तीन लाखांची उलाढाल झाल्याचेही बाजार समितीच्या प्रशासनाने सांगितले. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून शुकशुकाट असलेल्या बाजार समितीच्या आवार गजबजलेला दिसून आला होता. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांना बैल बाजाराची घरघर लागली असतांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळोद्याच्या बैल बाजाराने थोडी का असेना उसळी घेतल्याने कर्मचाºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बाजार समितीने हे चित्र कायम राखण्याची अपेक्षाही शेतकºयांनी व्यक्त केली आहे.