शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जिल्ह्यातील २८ हजार शेतकऱ्यांना मिळू शकतो प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

नंदुरबार : महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांचे १८ कोटी ९२ लाखांचे कर्ज माफ झाले आहे. ...

नंदुरबार : महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांचे १८ कोटी ९२ लाखांचे कर्ज माफ झाले आहे. यातून कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी नियमित कर्ज भरणारे २८ हजार ४१७ शेतकरी अद्यापही ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. हे शेतकरी शासन अनुदान देणार कधी, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षात जिल्हा बँकेकडून सुमारे सहा हजार ९९० शेतकऱ्यांना ८२ कोटी १० लाख तर राष्ट्रीयीकृत बँकांकडून १९२ कोटी रुपयांचे कर्ज एकूण २५ हजार ३६२ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. यंदाच्या वर्षातही बँकांना साधारण २०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य आहे; परंतु जिल्ह्यात घोषित झालेल्या प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी झालेली नसल्याने एप्रिल महिन्यापासून कर्ज घ्यावे किंवा नाही, या पेचात शेतकरी अडकले आहेत. यावर शासनाने तातडीने निर्णय देत प्रोत्साहन रक्कम द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी करत असून, वारंवार सहकार विभागाकडे चाैकशी करत आहेत. जिल्ह्यात २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी अभियानांतर्गत १६ हजार ७६४ शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. यात ९ हजार ४१३ हे नियमित कर्ज घेणारे व त्याचा परतावा करणारे शेतकरी असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे शेतकरी प्रोत्साहन योजनेला पात्र आहेत.

२५ हजार शेतकरी कर्जमुक्त

नंदुरबार जिल्ह्यातील एकूण २५ हजार २२ शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे लाभार्थी आहेत. या शेतकऱ्यांचे १८ कोटी ९२ लाख रुपयांचे कर्ज शासनाने माफ केले आहे. या शेतकऱ्यांना येत्या काळात खरीप कर्ज मिळण्याच्या अडचणी दूर झाल्या आहेत. शेतकऱ्यांना एनओसी मिळाल्याने त्यांना तातडीने कर्ज मिळू शकेल.

सहकार विभागाकडे योजना

दरम्यान ही योजना सहकार विभागाकडे असल्याने शेतकरी त्याठिकाणी विचारणा करत आहेत. कृषी विभागाकडे प्रोत्साहन योजनेची कोणतीही माहिती नाही. शेतकऱ्यांच्या याद्याही सहकार विभागाने अपडेट केल्या आहेत.

सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रोत्साहन योजनेचा अद्याप जीआरच निघालेला नाही.