शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षभरात २८ मातांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:31 IST

सातपुड्याच्या दुर्गम भागासह सपाटीच्या गावांचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात ६७ टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. यातील निम्म्यापेक्षा अधिक जण हे ...

सातपुड्याच्या दुर्गम भागासह सपाटीच्या गावांचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात ६७ टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. यातील निम्म्यापेक्षा अधिक जण हे आरोग्यदायी जीवनासाठी शासकीय दवाखान्यांवर अवलंबून आहेत. यात गर्भवती मातांचा समावेश असून या मातांची प्रसूती ही जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येते. २०२० या वर्षात कोरोनासोबत आरोग्य विभाग दोन हात करत असताना मातामृत्यूच्या घटनाही वाढल्या होत्या. बाळाला जन्म देत असताना मृत्यू पावलेल्या ३४ पैकी १३ मातांची नवजात बालके या जगात सुखरूप आहेत. तर २१ बालकांनी मातांसोबत जगाचा निरोप घेतला होता. प्रसूतीदरम्यान रक्तदाब वाढणे, अंतर्गत रक्तस्त्राव, कमकुवत शरीर यासह विविध वैद्यकीय कारणांमुळे या मातांचा मृत्यू झाला आहे. शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूसोबतच नंदुरबारातील एका खासगी रुग्णालयातही मातेचा मृत्यू झाल्याची घटना नमूद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२० या काळात एकूण ३५ मातांचा मृत्यू झाला आहे. यात एप्रिल महिन्यात तीन मातांचा मृत्यू झाला होता. यातील एक मृत्यू घरी, एक धडगाव तर एक नंदुरबार शहरातील खासगी रुग्णालयात झाला होता. या काळात कडक लाॅॅकडाऊन सुरू होते.

मे महिन्यात सहा मातांचा मृत्यू झाला. यातील चार मातांचा मृत्यू जिल्हा रुग्णालय, एका मातेचा रुग्णालयात आणताना रस्त्यात तर एका मातेचा मृत्यू हा अक्कलकुवा येथे झाला.

जून महिन्यात दोन मातांचा मृत्यू झाला. यातील एक माता जिल्हा रुग्णालय तर एक माता धडगाव तालुक्यात तिच्या घरी दगावली.

जुलै महिन्यात चार मातांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

ऑगस्ट महिन्यात सात मातांचा मृत्यू झाला. यातील सहा मातांचा जिल्हा रुग्णालय तर एका मातेचा मृत्यू विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात झाल्याची माहिती समोर आली आहे. ­

सप्टेंबर महिन्यात चार मातांचा मृत्यू झाला होता. हे सर्व मृत्यूही जिल्हा रुग्णालयात झाले होते.

ऑक्टोबर महिन्यात पाच मातांचा मृत्यू झाला. यात दोन जणी या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात येत असताना वाटेतच त्यांनी जीव सोडला. तर दोघींचा अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील त्यांच्या घरीच मृत्यू झाला. एका मातेचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात झाला.

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात तीन मातांचा मृत्यू झाला. यातील एका मातेचा प्रवासादरम्यान तर दोघींचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

डिसेंबर महिन्यात तीन मातांचा मृत्यू झाला. या तिघी माता जिल्हा रुग्णालयात दाखल होत्या.

२०२० या वर्षातील सर्वाधिक माता मृत्यू हे मे महिन्यात झाल्याचे समोर आले आहे. लाॅकडाऊन काळात हे मृत्यू झाले होते. रक्तदाब आणि इतर कारणांमुळे हे मृत्यू झाल्याने मातांच्या आरोग्यविषयक गांभीर्य वाढले आहे. मृत्यू झालेल्या ९५ टक्के माता ह्या ग्रामीण भागातील आहेत.

तीन मातांचा रस्त्याच झाला मृत्यू

धडगाव येथून सोन प्राथमिक आरोग्य केंद्रात जाताना २६ वर्षीय मातेचा मे २०२० मध्ये, बाहेरील जिल्ह्यातून नंदुरबारकडे येत असताना ३० वर्षीय मातेचा अक्कलकुवा येथून जिल्हा रुग्णालयाकडे येताना मृत्यू झाला होता. या मातांचा मृत्यू हा योग्यवेळी उपचार न मिळाल्याने झाला असावा असा अंदाज आहे. दरम्यान, तीन मातांचा घरीच मृत्यू झाला असल्याचे समोर आलेल्या यादीत दिसून आले आहे. या मातांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मयत झालेल्या तीनही माता या सातपुड्याच्या दुर्गम भागातील रहिवासी असल्याचे समजते.