शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

विविध योजनांचे 225 प्रकरणे मंजूर : तळोदा तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 12:50 IST

आदेशाचे वाटप, 125 प्रकरणे कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी नामंजूर

लोकमत ऑनलाईननंदुरबार : संजय गांधी निराधार, राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन, वृद्धपकाळ निवृत्ती वेतन व श्रावण बाळ अशा वेगवेगळ्या योजनेंतर्गत दाखल झालेल्या 350 प्रकरणांपैकी 225 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, यातील 125 प्रकरणे विविध त्रुटींच्या पूर्ततेअभावी नामंजूर करण्यात आली   आहे.शासनाच्या संजय गांधी निराधार समितीची बैठक मंगळवारी येथील प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीच्या सभागृहात घेण्यात आली. गेल्या दोन-तीन महिन्याच्या कालवधीत येथील महसूल प्रशासनाकडे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, राष्ट्रीय विधवा निवृती योजना, अपंग निवृत्ती योजना अशा वेगवेगळ्या योजनातून शासनाचे अर्थसहाय्य मिळविण्यासाठी साधारण 350 प्रकरणे दाखल करण्यात आली होती. या प्रकरणांवर प्रशासनाने कार्यवाही करून त्यातील सव्वादोनशे प्रकरणे समितीने मंजूर केले आहेत. यातील सव्वाशे प्रकरणांमध्ये कागद              पत्रांची अपूर्तता व त्रुटी आढळून आल्याने ती नामंजूर करण्यात आली आहे. समितीने योजनेनिहाय मंजूर केलेली प्रकरणे अशी- राष्ट्रीय वृद्धापकाळ 128, विधवा अर्थसहाय्यक 25, संजय गांधी निराधार 32, श्रावण बाळ दोन या प्रमाणे आहेत. याप्रसंगी आमदार उदेसिंग पाडवी यांनी उपस्थित अधिका:यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाजातील गरीब घटकांना उदर निर्वाहासाठी शासनाच्या अशा वैयक्तीक लाभाच्या योजना आहेत. त्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी समितीने वेगवेगळ्या त्रुटीमुळे जी प्रकरणे बाजूला ठेवली आहेत. त्यावर संबंधित लाभाथ्र्याकडून कागद पत्रांची  तातडीने पूर्तता करून घ्यावी. जेणे करून तो लाभापासून वंचित राहणार नाही. कर्मचा:यांनी देखील यासाठी त्यांना मदत करण्याची सूचना दिली.या बैठकीस समितीचे सचिव तहसीलदार योगेश चंद्रे, सदस्य नितीन पाडवी, राजेंद्र राजपूत, अनुपकुमार उदासी, गटविकास अधिकारी शरद मगर, यशवंत पाडवी, रसिलाबेन देसाई, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार एस.पी. गंगावणे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, नायब तहसीदलार रामजी राठोड,अव्वल कारकून पेंढारकर आदींसह कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीतच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजनेतून 12 महिला लाभार्थ्ीना प्रत्येकी 20 हजाराचे धनादेश देण्यात आले. शासनाकडून तातडीने अर्थसहाय मिळाल्याने या लाभाथ्र्यानीही समाधान व्यक्त केले आहे.