शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

अक्कलकुवा तालुक्यात दोन महिन्यात २०० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

राज्यासह जिल्ह्यात यंदा कोरोनामुळे नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना बळींचा आकडा हा ७५० च्या पुढे गेला आहे. यातून ...

राज्यासह जिल्ह्यात यंदा कोरोनामुळे नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना बळींचा आकडा हा ७५० च्या पुढे गेला आहे. यातून भीती वाढून अनेकांनी धसका घेतला होता. यातून ज्येष्ठ नागरिकांच्या चिंता वाढून त्यांना वृद्धापकाळात हृदयविकाराचे धक्के सहन न झाल्याने त्यांचे मृत्यू झाल्याच्या नोंदी तालुक्यात आहेत. याबाबत तालुक्यातील विविध गावांमधील मयतांच्या नातलगांनी केलेल्या मृत्यू दाखल्यांच्या नोंदी तपासल्या असता, १८९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात खापर, घंटाणी, कंकाळी, काकरपाडा, मोलगी, सोरापाडा, अक्कलकुवा, ब्राह्मणगाव, मालपाडा, ईटवाई, कोयलीविहीर, ओहवा, गव्हाळी, डोडवा, नवापाडा, सिंगपूर बुद्रूक, जानीआंबा, मांडवीआंबा, खटवाणी, आंबाबारी, डनेल, तालंबा, काकडीआंबा, रामपूर, शेंदवण, बिजरीगव्हाण, बेडाकुंड, मक्राणीफळी, अक्कलकुवा या गावांमध्ये झालेल्या मृत्यूच्या या नोंदी आहेत. वृद्धापकाळाने मयत झालेल्यांची संख्या सर्वाधिक असून त्यानंतर दीर्घ आजार, मधुमेह, टीबी, जुना दमा यासह इतर आजारांनी मयत झालेल्यांची संख्या समोर आली आहे. तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील विविध भागात आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे ठरत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील आरोग्य सोयी ह्या यथातथाच असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, परंतु वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नसल्याचे प्रकार कायम समोर आले आहेत. यातून आता मृत्यूचा दर वाढला असल्याने त्याचा योग्य त्या पद्धतीने शोध घेत तालुकावासीयांना दिलासा देण्याची गरज आहे. विविध आजारांनी हे मृत्यू झाले असले तरी त्या आजारांवर उपचार करता येत नसल्याने अनेक जणांचा घरीच मृत्यू आहे. यामुळे आरोग्य विभागाने गंभीर आजारी रुग्णांची काळजी घेण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची अपेक्षा आहे.