शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२०० बेडचा कोवीड कक्ष लवकरच सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 11:57 IST

संडे स्पेशल मुलाखत साधन आणि सुविधा यांचा बाऊ न करता काम करणे आणि रुग्णामध्ये आत्मविश्वास निर्माण केला तर संकटावर मात करता येते- डॉ.राजेश वसावे

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोवीड कक्षात आलेल्या रुग्णामध्ये आधी विश्वास निर्माण करावा लागतो, त्याचा बरा होण्याचा आत्मविश्वास आणि औषधोपचार यांची सांगड घालून रुग्ण कोरोनामुक्त करण्यात येत आहे. यासाठी या कक्षातील डॉक्टरपासून स्वच्छता कर्मचारीपर्यंत सर्वांची मेहनत आहे. त्यामुळेच ३२ पैकी १९ रुग्ण बरे करू शकलो अशी माहिती नंदुरबार कोवीड कक्षाचे प्रमुख डॉ.राजेश वसावे यांनी दिली. त्यांच्याशी केलेली बातचीत...कोवीड कक्षात बेडची संख्या पुरेशी आहे का?जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात सद्य स्थितीत बेडची संख्या पुरेशी आहे. असे असले तरी १०० बेडचा कक्ष सुसज्ज ठेवण्यात आला आहे. येत्या काही दिवसात २०० बेडचा कक्ष तयार होत आहे. त्यामुळे बेडची समस्या निर्माण होणार नाही हा विश्वास आहे.औषधी आणि कर्मचाऱ्यांसाठी साहित्याची काय स्थिती आहे?जिल्हा रुग्णालयात पाच व्हेंटीलेटर आहेत. त्यापैकी दोन व्हेंटीलेटर येथे उपलब्ध आहेत. दोन स्टॅण्डाबाय आहेत. औषधी साठा देखील पुरेसा आहे. मागणीप्रमाणे तो उपलब्ध आहे. कर्मचाऱ्यांना पीपीई किट आणि आवश्यक ते सर्व साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. रुग्णांसाठीही सर्व सुविधा कक्षात पुरविल्या जात आहेत. त्यामुळेच बरे होऊन गेलेले रुग्ण दुवा देवून जातात.किती कर्मचाºयांची नेमणूक आणि त्यांच्या कामाची पद्धत कशी आहे?कोवीड कक्षात कर्मचाºयांची सहा तासांची ड्युटी असते. तर डॉक्टरांची नेमणूक ही २४ तास असते. यात एक मुख्य डॉक्टर, एक सह डॉक्टर, एक सिस्टर, एक शिपाई, दोन स्वच्छता कर्मचारी, रेडिओलॉजिस्ट, एक्सरे तंत्रज्ञ व प्रयोगशाळा सहायक यांचा समावेश आहे. सात दिवस ड्युटी असते. २१ दिवसाचे रोटेशन करण्यात आले असून सिव्हीलमधील प्रत्येकाला ड्युटी देण्याचे नियोजन आहे.

कोवीड कक्षात नियुक्त कर्मचारी कोरोनामुक्त राहावे यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले, परंतु त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. कर्मचाऱ्यांचे नियमित स्वॅब घेतले जात आहेत.

समन्वयामुळेच शक्य... कोवीड कक्षात दाखल कोरोना रुग्ण आणि बरे होण्याचे प्रमाण हे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगले आहे. मृत्यूचे प्रमाण कमी आहे. हे सर्व जिल्हाधिकारी, सीईओ, सीएस, पोलीस अधीक्षक यांच्या समन्वयातून होणाऱ्या कामामुळेच आणि मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले आहे. यापुढील काळात लोकप्रतिनिधी, सामजिक संस्था, जागृक नागरिक यांनी मिळून कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्व घटकांचे समन्वय आणि सहकार्य राहिल्यास येणारा काळ कितीही वाईट असला तरी त्यावर मात करणे सहज शक्य होणार आहे.