नेमका मृत्यू कशामुळे?
शहरातील अवैध दारू विक्रीच्या दुकानावर नेहमीच किरकोळ कारणांवरून भांडणे उद्भवतात. त्याचपद्धतीने येथे तर भांडण झाले नसावे ना, अशीही चर्चा रंगत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच तरुणाने या भागात एका बकरीला फासावर लटकवले होते, अशीही नागरिक चर्चा करत आहेत. दरम्यान, अवैध दारू विक्रीला पायबंद बसल्यास खुनासारख्या घटना शहरात घडणार नाहीत व शहराच्या शांततेला गालबोट लागणार नाही, यासाठी दारूबंदी विभागाने अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी सूज्ञ नागरिकांकडून होत आहे. ज्या ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री होत असते, त्यापासून काही अंतरावर नागरिकांचे वसाहती गृह आहे. ३० ते ४० कुटुंबं त्या ठिकाणी राहात असतात. रोजचं समोरून येणे-जाणे महिला-पुरुषांचे सुरू असते. याचबरोबर या ठिकाणावरून दररोज पुणे-मुंबईकरिता आठ ते दहा खासगी ट्रॅव्हल्स बसेस सुटत असतात. युवक-युवती, महिला-पुरुष बससाठी येऊन थांबत असतात. वर्दळीच्या ठिकाणी नसल्याने या बेकायदेशीर दारू विक्रीच्या ठिकाणी दररोज दारू पिणाऱ्यांच्या भानगडी होत असतात. दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्ष व त्यांच्या नाकावर टिच्चून शहादे शहर व परिसराला लागूनच रस्त्याच्या ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्रीचे धंदे जोमाने सुरू आहेत. या अवैध व्यवसायामुळे शहादा शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. भविष्यात एखादी मोठी घटना झाली, तर त्यास जबाबदार कोण? असा सर्वस्वी प्रश्न चर्चिला जात आहे.