शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

१४ जणांना सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिलेला मारहाण करुन विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा नवापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महिलेला मारहाण करुन विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा नवापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली.याबाबत या खटल्याची हकीकत अशी, सोनखडके, ता.नवापूर येथे राहणारी महिला व गावातीलच तुळशिराम केश्या गावीत व त्याची पत्नी यांच्यात शेतीवरुन वाद होता. २६ जुलै २०१४ रोजी रोजी सायंकाळी ५ वासता फिर्यादी व फिर्यादीची सुन घरी असताना तुळशिराम केश्या गावीत व त्यांची पत्नी यांनी घरात घुसुन वाद घातला. त्यानंतर पुन्हा तुळशीराम केश्या गावीत, जेरमीबाई तुळशीराम गावीत, दावित तुळशीराम गावीत, रायश्या केश्या गावीत, संपत शिवा गावीत, राजु सारजी गावीत, बाला राश्या गावीत, रविंद्र जया गावीत, सुगाडया गावीत, प्रवीण विनोद गावीत, वसान्या रावजी गावीत, गोवजी वेचा गावीत, नोटा गोवल्या गावीत, साया थोटया गावीत यांनी घरात घुसुन महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केली. तुळश्या केश्या गावीत व दावित तुळशीराम गावीत अश्यांनी हाताबुक्यांनी मारहाण करुन महिलेचे कपडे फाडत विनयभंग केला. मारहाणीत महिला बेशुद्ध झाली होती. तिला उपचारासाठी नवापुर ग्रामीन रुग्णालयात दाखल केले होते.महिलेच्या फिर्यादीवरून नवापूर पोलिसात जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जमादार सुभाष काटके यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दोषारोपपत्र दाखल केले होते.न्या. राजीव बा.बहिरवाल यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी सुरू होती. न्यायालयाने सर्व साक्षी, पुरावे लक्षात घेवून सर्वच १४ जणांना तीन वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी १२ हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे. फिर्यादी महिलेस प्रत्येक आरोपीच्या दंडातुन दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी असे आदेश केले आहेत.सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.अजय सुरळकर यांनी पाहीले आहे. सदर खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन हवालदार प्रमोद पाठक होेते.मारहाणीच्या गुन्ह्यात एकाच वेळी सर्वच १४ आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा झाल्याने पिढीत महिलेने समाधान व्यक्त केले आहे. वरच्या न्यायालयात देखील ही शिक्षा कायम राहते किंवा कसे याकडे आता लक्ष लागून आहे. शेतीच्या किरकोळ वादातून हा प्रकार सोनखडके, ता.नवापूर येथे सहा वर्षांपूर्वी घडला होता. एकाच गावातील एवढ्या मोठ्या संख्येने आरोपी असल्याने गावाचेही लक्ष या निकालाकडे लागून होते.