शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

डेंग्यूची लागण झाल्याने 18 वर्षीय युवती दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील गाझी नगरातील 18 वर्षीय युवतीचा डेंग्यू सदृश तापाची लागण झाल्याने उपचार सुरु असताना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील गाझी नगरातील 18 वर्षीय युवतीचा डेंग्यू सदृश तापाची लागण झाल्याने उपचार सुरु असताना मृत्यू झाला़ 8 रोजी युवतीचा मृत्यू झाल्यानंतर शहरात डेंग्यूची साथ आटोक्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले असून घटनेनंतर आरोग्य यंत्रणा पुन्हा कामाला लागली आह़े     समीरा लतिफ मन्सूरी मयत युवतीचे नाव असून तिला 4 ऑक्टोबर रोजी डेंग्यूसदृश तापाची लागण झाली होती़ यानंतर तिच्या कुटूंबियांनी  तिला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होत़े प्रकृती जास्त बिघडल्याने तिला धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े याठिकाणी उपचार सुरु असताना तिचा 8 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता़ ही माहिती आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडून गाजीनगर परिसरात सव्रेक्षण सुरु करण्यात आल्याची माहिती आह़े जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून येत आहेत़ नवापुर येथील दोन मुलांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने साथ आटोक्यात असल्याचे सांगितले होत़े परंतू गेल्या 15 दिवसांपासून नंदुरबार शहरात पुन्हा डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण आढळून येत होत़े यातील बहुतांश रुग्णांना धुळे येथे दाखल करण्यात आले होत़े त्यांच्यावर उपचार पूर्ण करण्यात आल्याची माहिती आह़े जिल्हा रुग्णालयाच्या कक्षात गेल्या आठवडय़ात आठ तर तूर्तास सहा रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आह़े 

जिल्हा रुग्णालयात यंदापासून डेंग्यूची तपासणी करण्यासाठी एलिझा टेस्टची सोय करण्यात आली आह़े तसेच डेंग्यु सदृश तापाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्षाची निर्मिती केली गेली आह़े मंगळवार्पयत या कक्षात चार रुग्ण दाखल होत़े तर डेंग्यूमुळे प्रकृती खराब असलेल्या एकास अतीदक्षता तर सुधारणा होत असलेल्या एका सामान्य विभागात ठेवण्यात आले होत़े रुग्णालयात सोय असतानाही शहरातील लागण झालेले निम्मे रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत़ जिल्हा रुग्णालयात सुविधा मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आह़े 

ुयुवतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने औषध फवारणी केल्याची माहिती दिली असली तरी गेल्या आठ दिवसांपासून शहरात डेंग्यूसदृश तापाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढूनही प्रशासनाने गांभिर्याने घेतलेले नसल्याने नागरिकांचे म्हणणे आह़े घरात साठवलेल्या उघडय़ा पाण्यावर रसायन टाकले जात असले तरी गेल्या दोन महिन्यांपासून जागोजागी साठून असलेल्या पाण्याचे काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आह़े धुळे चौफुली परिसरातून वाहणा:या नाल्यांचे पाणी काही ठिकाणी साचून असल्याने त्याठिकाणी डेंग्यूच्या डासांची निर्मिती होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आह़े हिवताप विभागाने माहिती दिल्यानंतर पालिका कर्मचारी त्या-त्या भागात धुरळणी व फवारणी करत असल्याचेही सांगण्यात आले आह़े