शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेतून १७५ जणांना मिळणार १० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST

नंदुरबार : केंद्र शासनाने घोषित केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना जिल्ह्यात लागू ...

नंदुरबार : केंद्र शासनाने घोषित केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना जिल्ह्यात लागू झाली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७५ जणांना १० लाखांपर्यंतचे अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. या अनुदानामुळे कृषीपूरक खाद्य प्रक्रिया उद्योगांची भरभराट होणार आहे.

केंद्र शासनाने जिल्ह्याला यंदाच्या २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी १७५ जणांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवले आहे. कृषी विभागाच्या सहकार्याने बँकांकडून ३५ टक्के अनुदानित रक्कम देण्याचे नियोजन यातून करण्यात आले आहे. योजना सध्या जिल्ह्यात सुरू झाली असून, २९ जणांचे अर्ज कृषी विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हे अर्ज बँकांकडे पाठवून त्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसात सुरू होणार आहे.

जिल्ह्यात विविध पूरक उद्योग चालवणाऱ्यांसह युवा उद्योजकांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. मिरची कांडप, खाद्यप्रक्रिया, धान्य प्रक्रिया आदी उद्योगांना हे अनुदान मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी यंदाच्या वर्षात देण्यात आलेल्या १७५ जणांच्या उद्दिष्टांतर्गत १४० हे सर्वसामान्य गटातील, ५ अनुसूचित जाती तर ३० अनुसूचित जमातीतील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत आलेल्या २९ उद्याेगांचे अर्ज बँकांकडे पडताळणीसाठी गेल्याने योजनेसाठीचे अनुदान मिळण्याची शक्यता आहे. एक जिल्हा एक उत्पादन असे या योजनेचे उद्दिष्ट्य असल्याने भगर किंवा तत्सम धान्यांच्या प्रक्रिया उद्योगांचा मार्ग मोकळा होऊन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फायदाही यातून होण्याची शक्यता आहे.

असा करू शकतील गरजू अर्ज

कृषी विभागाने योजनेत सहभागी होणाऱ्या इच्छुकांसाठी पीएसएमई या शासकीय संकेेतस्थळावरून अर्ज करता येतो. संकेतस्थळावरून अर्ज करणे अडचणीचे ठरत असल्यास जिल्हा स्तरावर ९ जणांची संसाधन व्यक्ती अर्थात रिसोर्स पर्सन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची संपूर्ण माहिती कृषी विभागाकडे आहे. त्यांच्याकडून हे भरले जावू शकतात.

बँकांच्या सहाय्याने योजना जिल्ह्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनेचा लाभ इच्छुकांना घेता यावा, यासाठी रिसोर्स पर्सन नियुक्त आहेत. त्यांची माहिती कृषी विभागाने सार्वजनिक केली होती. या योजनेतून खाद्य प्रक्रिया उद्योगांची विस्कटलेली घडी पुन्हा बसणार आहे. जिल्ह्यालाही याचा औद्योगिकदृष्ट्या लाभ होईल.

-एन.डी.भागेश्वर,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.