शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेतून १७५ जणांना मिळणार १० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST

नंदुरबार : केंद्र शासनाने घोषित केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना जिल्ह्यात लागू ...

नंदुरबार : केंद्र शासनाने घोषित केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना जिल्ह्यात लागू झाली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७५ जणांना १० लाखांपर्यंतचे अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. या अनुदानामुळे कृषीपूरक खाद्य प्रक्रिया उद्योगांची भरभराट होणार आहे.

केंद्र शासनाने जिल्ह्याला यंदाच्या २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी १७५ जणांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवले आहे. कृषी विभागाच्या सहकार्याने बँकांकडून ३५ टक्के अनुदानित रक्कम देण्याचे नियोजन यातून करण्यात आले आहे. योजना सध्या जिल्ह्यात सुरू झाली असून, २९ जणांचे अर्ज कृषी विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हे अर्ज बँकांकडे पाठवून त्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसात सुरू होणार आहे.

जिल्ह्यात विविध पूरक उद्योग चालवणाऱ्यांसह युवा उद्योजकांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. मिरची कांडप, खाद्यप्रक्रिया, धान्य प्रक्रिया आदी उद्योगांना हे अनुदान मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी यंदाच्या वर्षात देण्यात आलेल्या १७५ जणांच्या उद्दिष्टांतर्गत १४० हे सर्वसामान्य गटातील, ५ अनुसूचित जाती तर ३० अनुसूचित जमातीतील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत आलेल्या २९ उद्याेगांचे अर्ज बँकांकडे पडताळणीसाठी गेल्याने योजनेसाठीचे अनुदान मिळण्याची शक्यता आहे. एक जिल्हा एक उत्पादन असे या योजनेचे उद्दिष्ट्य असल्याने भगर किंवा तत्सम धान्यांच्या प्रक्रिया उद्योगांचा मार्ग मोकळा होऊन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फायदाही यातून होण्याची शक्यता आहे.

असा करू शकतील गरजू अर्ज

कृषी विभागाने योजनेत सहभागी होणाऱ्या इच्छुकांसाठी पीएसएमई या शासकीय संकेेतस्थळावरून अर्ज करता येतो. संकेतस्थळावरून अर्ज करणे अडचणीचे ठरत असल्यास जिल्हा स्तरावर ९ जणांची संसाधन व्यक्ती अर्थात रिसोर्स पर्सन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची संपूर्ण माहिती कृषी विभागाकडे आहे. त्यांच्याकडून हे भरले जावू शकतात.

बँकांच्या सहाय्याने योजना जिल्ह्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनेचा लाभ इच्छुकांना घेता यावा, यासाठी रिसोर्स पर्सन नियुक्त आहेत. त्यांची माहिती कृषी विभागाने सार्वजनिक केली होती. या योजनेतून खाद्य प्रक्रिया उद्योगांची विस्कटलेली घडी पुन्हा बसणार आहे. जिल्ह्यालाही याचा औद्योगिकदृष्ट्या लाभ होईल.

-एन.डी.भागेश्वर,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.