शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

नंदुरबार जिल्ह्यातील १६ प्रकल्पांमध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:37 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील १६ लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट झाला असून आठ प्रकल्पांमध्ये २५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. दरम्यान, एकुण पाणी ...

नंदुरबार : जिल्ह्यातील १६ लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट झाला असून आठ प्रकल्पांमध्ये २५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. दरम्यान, एकुण पाणी साठा केवळ ४० टक्के इतका आहे. येत्या महिनाभरात जिल्ह्यातील सर्वच लघु प्रकल्प कोरडे होण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा ६७ टक्के पाऊस झाला होता. झालेला पाऊस देखील अनियमित होता. त्यामुळे खरीपाचे नुकसान तर झाले. परंतु लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये देखील अपेक्षीत पाणीसाठा झाला नाही. जिल्ह्यात ३७ लघु व चार मध्यम प्रकल्प आणि दोन बॅरेजेस आहेत. त्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापर्यंत केवळ ६० टक्के पाणीसाठा झाला होता. एकही लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला नव्हता. केवळ रंगावली मध्यम प्रकल्प यंदा पुर्ण क्षमतेने भरला होता. आता सर्वच प्रकल्पांमधील पाणीसाठा कमालीचा खालावला असून काही प्रकल्प कोरडे पडले आहेत.१६ प्रकल्प कोरडेजिल्ह्यातील शहादा, नंदुरबार तालुक्यातील १६ प्रकल्प कोरडे झाले आहेत. या प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. तर आठ प्रकल्पांमध्ये २५ टक्केच्या आत पाणीसाठा आहे. इतर प्रकल्पांमध्ये ४० ते ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांपैकी रंगावली मध्यम प्रकल्पात सरासरी ६० टक्के पाणीसाठा आहे. राणीपूर प्रकल्पात ५५ टक्के, दरा प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पांमधील खालावलेली पाणी पातळीमुळे अनेक प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी देखील यंदा अपेक्षीत आवर्तन सोडले गेले नसल्याचे चित्र आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांची रब्बी पिके वाया गेली तर काही भागात कमी उत्पादन मिळाले.पाणी पातळी खालावलीजिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू शकले नाही. शिवाय प्रकल्पांमध्येही अपेक्षीत पाणी साठा न झाल्याने भुगर्भातील पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. यंदा सरासरी एक ते दीड मिटरने पाणी पातळी खालावल्याचा अहवाल भुजल सर्व्हेक्षण विभागाने याआधीच दिला आहे. त्यामुळे पिकांना तर नाहीच आता पिण्यासाठी देखील पाणी नसल्याची स्थिती आहे.