लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 15 हजार शेतक:यांना 190 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. शेतक:यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतीचे आधुनिकीकरण करावे. असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात बोलतांना केले.स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाला. त्यावेळी रावल बोलत होते. त्यांनी सांगितले, जिल्ह्यात 2.70 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 2.74 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पुर्ण झाली असून जिल्ह्यात सरासरी 104 टक्के पेरणी झाली आहे. तळोद्यासह शहादा तालुक्यातील काही पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यावर कृषी विभागामार्फत आवश्यक त्या उपाययोजना सुरू असून शेतक:यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी 25 हजार शेतक:यांना कर्ज माफीचे अर्ज वाटप करण्यात आले असून आजतागायत जवळपास आठ हजार 465 शेतक:यांनी माहिती भरून सादर केली आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2017 मध्ये जिल्ह्यात आठ हजार 655 कजर्दार, दोन हजार 19 बिगरकजर्दार व वाढीव मुदतीचे 370 कजर्दार असे एकुण 11 हजार 54 शेतक:यांना पीक विमा योजनेत सहभागी करून घेण्यात आले आहे. जिल्ह्यात 99 टक्के सातबारा संगणकीकृत झाले आहेत. जिल्ह्यात बेसलाईन सव्रेक्षण 2012 नुसार एकुण कुटूंबांची संख्या दोन लाख 56 हजार 381 असून त्यापैकी एक लाख 53 हजार 566 कुटूंबांना स्वच्छ भारत मिशनअंतर्गत अनुदानाचा लाभ देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळाल्याने व जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. याशिवाय स्वच्छ भारत मिशनअंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल नवापूर पंचायत समिती सभापती सविता गावीत व गटविकास अधिकारी एन.डी.वाळेकर, ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत प्रथम पुरस्कारप्राप्त पुरुषोत्तमनगरच्या सरपंचा ज्योती पाटील, द्वितीय पुरस्कारप्राप्त शकुंतला गावीत व तृतीय बेबीबाई पाडवी, उत्कृष्ट कर्मचारी म्हणून बांधकाम विभागातील बी.एल.मोरे, जिल्हा क्रीडा पुरस्कारप्राप्त राजेश परदेशी यांचा जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचलन प्रकाश चौधरी यांनी केले.
15 हजार शेतक:यांना 190 कोटींचे पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 12:35 IST
25 हजार कजर्मार्फी अर्ज वितरीत : पालकमंत्र्यांची स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात माहिती
15 हजार शेतक:यांना 190 कोटींचे पीक कर्ज वाटप
ठळक मुद्देसुकाणू समितीच्या वतीने आंदोलन 4शेतकरी कजर्माफीसंदर्भात गठीत सुकाणू समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. समितीच्या सदस्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य प्रशासकीय सोहळ्या