शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

143 कारखाने धोकेदायक श्रेणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:03 IST

जागतिक पर्यावरण दिन लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोठय़ा उद्योगांची वानवा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकूण 439 छोटेमोठे उद्योग आहेत़ ...

जागतिकपर्यावरण दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोठय़ा उद्योगांची वानवा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकूण 439 छोटेमोठे उद्योग आहेत़ या उद्योगांच्या तपासण्या गेल्या 10 वर्षात पूर्णपणे रखडल्या असून प्रदूषण नियंत्रण मंडळही नावालाच भेटी देत असल्याने कारखान्यांचे सांडपाणी आणि त्यातून होणा:या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आह़े    जिल्हानिर्मितीनंतर येथे मोठे उद्योग येऊन भरभराट होईल अशी अपेक्षा होती़ परंतू गत 20 वर्षात जे कारखाने सुरु आहेत़ त्यातून मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचे समोर आले आह़े बहुतांश उद्योग हे छोटय़ा स्केलवर चालवले जात असले तरी त्यातून सोडले जाणारे सांडपाणी आणि वायू यामुळे प्रदूषण होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर आले आह़े जिल्ह्यात एकूण उद्योगांपैकी 143 उद्योग हे रेड झोनमध्ये आहेत़ यात अक्कलकुवा 1, तळोदा 1, शहादा 51, नंदुरबार 62 तर नवापूर तालुक्यात 28 उद्योग आहेत़ प्लास्टिकपासून विविध साधने तयार करण्यासाठी रासायनिक उद्योगांच्या या फॅक्टरांच्या तपासण्या करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथे 20 वर्षात अधिकारीच नियुक्त केलेला नसल्याने या कारखान्यांच्या पाईपांमधून नदी-नाल्यात दिवसढवळ्या सांडपाणी सोडले जात असल्याची स्थिती आह़े यातून अनेक नाले जलप्रदूषणाचे स्त्रोत बनले आहेत़ 

शासनाने निर्धारीत बंदी घातलेल्या व प्रदूषणास धोकेदायक ठरणा:या प्लास्टिकच्या पिशव्यांचा शहरी भागात सर्रास वापर होतो़़ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका:यांनी केवळ तीन वेळा नंदुरबार पालिकेच्या सहाकार्याने पिशव्या जप्त केल्या़ त्यानंतर मात्र कारवाई झालेली नाही़ शहादा शहरातही बंदी असलेल्या पिशव्या नागरिकांना विक्रेते सहज देत असल्याचे सातत्याने दिसून आले आह़े नंदुरबार जिल्ह्यात साखर हंगामात पुरुषोत्तमनगर ता़ शहादा, डोकारे ता़ नवापूर येथे सहकारी तर समशेरपूर ता़ नंदुरबार येथे खाजगी तत्त्वावर साखर कारखाना चालवण्यात येतो़ या कारखान्यांची वार्षिक तपासणी धुळे येथील प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून करण्यात येत़े कारखान्याच्या चिमणीतून सोडण्यात येणा:या धुरामुळे अधिकचे प्रदूषण होऊ नये, यासाठी तिन्ही कारखान्यात धूर सोडतेवेळी धुरांडय़ात पाणी सोडण्यात येत़े यामुळे वातावरणाला हानी पोहोचवणारे घटक कमी होऊन धूर बाहेर पडतो़ तिन्ही कारखान्यांनी पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आह़े तसेच याठिकाणी मळीपासून इथेनॉलचीही निर्मिती होत़े