शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

125 जादा बसफे:यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 11:15 IST

गौरी-गणपती उत्सव : टोलचा भरुदड मात्र सोसावा लागणार

ठळक मुद्दे थेट गावापासून बससेवा ठराविक प्रवासी संख्या असल्यास थेट गावापासून बससेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े बहुतेक वेळा गावातील ग्रामस्थ कोकणातील गणेशोत्सवाला एकजुटीने जात असतात़ अशा प्रवाशांना सोयीचे ठरावे यासाठी संबंधित आगाराकडून थेट गावकर्मचा:यांच्या ओव्हरटाईमवर कात्री गौरी-गणपतीसाठी जादा बसफे:यांचे नियोजन आह़े त्यामुळे साहजिकच यासाठी चालक-वाहकांवरही याचा अतिरिक्त कामाच्या तासांचा बोजा पडणार आह़े परंतु कर्मचा:यांच्या ऑव्हरटाईमवर विभागाकडून कात्री लागण्याची शक्यता आह़े मिळालेल्या माहिती

न्यूज नेटवर्कनंदुरबार : गौरी-गणपतींच्या काळादरम्यान एसटी महामंडळाकडून 125 जादा बसफे:यांचे नियोजन आह़े एसटी बसेसना टोलमाफी देण्यात यावी या धुळे विभागाच्या विनंतीला संबंधित विभागाकडून नकार देण्यात आला आह़ेयाबाबत धुळे विभागाकडून संबंधित प्रशासनाला पत्र देण्यात आले होत़े यात गौरी-गणपतींसाठी एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यात आलेल्या जादा बसेसना टोलमाफी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती़ परंतु याबाबत प्रतिसाद मिळाला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आह़े येत्या काळातील गौरी-गणपतीसाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील विविध आगारांकडून जादा बसफे:यांचे नियोजन करण्यात आले आह़े याबाबत आगर व्यवस्थापकांना धुळे विभागाकडून पत्र प्राप्त झाले असून 22 ऑगस्टपासून या बसेस टप्प्या-टप्प्याने पाठविण्यात येणार आह़े 25 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आह़े यानिमित्त मोठय़ा संख्येने चाकरमानी मुंबई तसेच कोकणात जात असतात़ त्यानिमित्त जादा भारमानाची शक्यता लक्षात घेता एसटी महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात येत          आह़े 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत जादा बसफे:यांचे नियोजन करण्यात आले आह़े यानुसार, धुळे आगाराकडून 20 बसेस बोरीवली बसस्थानकार्पयत सोडण्यात येणार आह़े तसेच साक्री आगार 15 तर दोंडाईचा आगारातील 10 बसेस भाईंदर बसस्थानकापर्यत सोडण्यात येणार आह़े तसेच   नंदुरबार आगाराकडून 15, शहादा आगाराकडून 17 बसेस, शिरपूर आगाराकडून 17 बसेस , नवापूर आगाराकडून 11 बसेस ,शिंदखेडा आगाराकडून 10 बसेस, अक्कलकुवा आगाराकडून 10 बसेस भिवंडी बसस्थानकार्पयत सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ अशा प्रकारे एकूण 125 बसेसचे नियोजन करण्यात आले  आह़े बसेस रिकाम्या जाणार नाही याची दक्षता घ्यावीजादा वाहतुकीसाठी पाठविण्यात येणा:या बसेस कोणत्याही परिस्थितीत रिकाम्या जाणार नाही तसेच परतीच्या वेळीही रिकाम्या येणार नाहीत याची दक्षता संबंधित               आगार व्ययवस्थापकांनी घ्यायची असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आह़े  25 ऑगस्ट रोजी               गणेश चतुर्थी, 30 ऑगस्ट गौरी पुजन, 31 ऑगस्ट गौरी विसजर्न, पाच  सप्टेंबर अनंत चतुर्दशी आदी महत्वाच्या दिवसांसाठी विभागाकडून बसेसची विशेष तरतुद करण्यात आली़ एसटी महामंडळासमोर खाजगी वाहनाची समस्या कायमदरम्यान, धुळे विभागाकडून जादा बससेची व वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली असली तरीदेखील महामंडळासमोर खाजगी वाहतुकीची समस्या कायम आह़े प्रवाशांना जास्तीत जास्त आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येत असतो़ महामंडळाकडून जादा बससेवा देण्यात येत असल्या तरीदेखील प्रवासी खाजगी वाहनांचाच वापर करीत  असल्याचे अनेक वेळा दिसून येत असत़े त्यामुळे कमी भारमानामुळे एसटी बसेसच्या फे:या तोटय़ात सापडत असतात़  त्यामुळे तोटय़ात असल्यावरही त्यांना बसफे:या कायम ठेवाव्या लागत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, जादा बसफे:यांसाठी सुमारे दीडशे चालक व वाहकांचे नियोजन आगाराकडून करण्यात आले आह़े बसेसची दुरुस्ती करुन चांगल्या अवस्थेत असलेल्या बसेसच वाहतुकीसाठी वापराव्यात, कंत्राटीपध्दतीने चालक किंवा वाहकांची व्यवस्था करु नये अशा सूचना धुळे विभागाकडून सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या  आहेत़