शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

125 जादा बसफे:यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 11:15 IST

गौरी-गणपती उत्सव : टोलचा भरुदड मात्र सोसावा लागणार

ठळक मुद्दे थेट गावापासून बससेवा ठराविक प्रवासी संख्या असल्यास थेट गावापासून बससेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े बहुतेक वेळा गावातील ग्रामस्थ कोकणातील गणेशोत्सवाला एकजुटीने जात असतात़ अशा प्रवाशांना सोयीचे ठरावे यासाठी संबंधित आगाराकडून थेट गावकर्मचा:यांच्या ओव्हरटाईमवर कात्री गौरी-गणपतीसाठी जादा बसफे:यांचे नियोजन आह़े त्यामुळे साहजिकच यासाठी चालक-वाहकांवरही याचा अतिरिक्त कामाच्या तासांचा बोजा पडणार आह़े परंतु कर्मचा:यांच्या ऑव्हरटाईमवर विभागाकडून कात्री लागण्याची शक्यता आह़े मिळालेल्या माहिती

न्यूज नेटवर्कनंदुरबार : गौरी-गणपतींच्या काळादरम्यान एसटी महामंडळाकडून 125 जादा बसफे:यांचे नियोजन आह़े एसटी बसेसना टोलमाफी देण्यात यावी या धुळे विभागाच्या विनंतीला संबंधित विभागाकडून नकार देण्यात आला आह़ेयाबाबत धुळे विभागाकडून संबंधित प्रशासनाला पत्र देण्यात आले होत़े यात गौरी-गणपतींसाठी एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यात आलेल्या जादा बसेसना टोलमाफी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती़ परंतु याबाबत प्रतिसाद मिळाला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आह़े येत्या काळातील गौरी-गणपतीसाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील विविध आगारांकडून जादा बसफे:यांचे नियोजन करण्यात आले आह़े याबाबत आगर व्यवस्थापकांना धुळे विभागाकडून पत्र प्राप्त झाले असून 22 ऑगस्टपासून या बसेस टप्प्या-टप्प्याने पाठविण्यात येणार आह़े 25 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आह़े यानिमित्त मोठय़ा संख्येने चाकरमानी मुंबई तसेच कोकणात जात असतात़ त्यानिमित्त जादा भारमानाची शक्यता लक्षात घेता एसटी महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात येत          आह़े 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत जादा बसफे:यांचे नियोजन करण्यात आले आह़े यानुसार, धुळे आगाराकडून 20 बसेस बोरीवली बसस्थानकार्पयत सोडण्यात येणार आह़े तसेच साक्री आगार 15 तर दोंडाईचा आगारातील 10 बसेस भाईंदर बसस्थानकापर्यत सोडण्यात येणार आह़े तसेच   नंदुरबार आगाराकडून 15, शहादा आगाराकडून 17 बसेस, शिरपूर आगाराकडून 17 बसेस , नवापूर आगाराकडून 11 बसेस ,शिंदखेडा आगाराकडून 10 बसेस, अक्कलकुवा आगाराकडून 10 बसेस भिवंडी बसस्थानकार्पयत सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ अशा प्रकारे एकूण 125 बसेसचे नियोजन करण्यात आले  आह़े बसेस रिकाम्या जाणार नाही याची दक्षता घ्यावीजादा वाहतुकीसाठी पाठविण्यात येणा:या बसेस कोणत्याही परिस्थितीत रिकाम्या जाणार नाही तसेच परतीच्या वेळीही रिकाम्या येणार नाहीत याची दक्षता संबंधित               आगार व्ययवस्थापकांनी घ्यायची असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आह़े  25 ऑगस्ट रोजी               गणेश चतुर्थी, 30 ऑगस्ट गौरी पुजन, 31 ऑगस्ट गौरी विसजर्न, पाच  सप्टेंबर अनंत चतुर्दशी आदी महत्वाच्या दिवसांसाठी विभागाकडून बसेसची विशेष तरतुद करण्यात आली़ एसटी महामंडळासमोर खाजगी वाहनाची समस्या कायमदरम्यान, धुळे विभागाकडून जादा बससेची व वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली असली तरीदेखील महामंडळासमोर खाजगी वाहतुकीची समस्या कायम आह़े प्रवाशांना जास्तीत जास्त आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येत असतो़ महामंडळाकडून जादा बससेवा देण्यात येत असल्या तरीदेखील प्रवासी खाजगी वाहनांचाच वापर करीत  असल्याचे अनेक वेळा दिसून येत असत़े त्यामुळे कमी भारमानामुळे एसटी बसेसच्या फे:या तोटय़ात सापडत असतात़  त्यामुळे तोटय़ात असल्यावरही त्यांना बसफे:या कायम ठेवाव्या लागत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, जादा बसफे:यांसाठी सुमारे दीडशे चालक व वाहकांचे नियोजन आगाराकडून करण्यात आले आह़े बसेसची दुरुस्ती करुन चांगल्या अवस्थेत असलेल्या बसेसच वाहतुकीसाठी वापराव्यात, कंत्राटीपध्दतीने चालक किंवा वाहकांची व्यवस्था करु नये अशा सूचना धुळे विभागाकडून सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या  आहेत़