शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

11 हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 13:06 IST

सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती रखडली : विद्यार्थी व पालकांची फरफट

लोकमत न्यूज नेटवर्कतळवे : सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत देण्यात येणा:या शिष्यवृत्ती पासून तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन तालुक्यातील 11 हजार शालेय आदिवासी विद्यार्थी वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात शालेय स्तरावरून ऑनलाईन प्रस्तावात त्रुटी असल्यामुळे प्रलंबित असल्याचे कारण शिक्षण विभागाने दिले आहे.योजनेंतर्गत गेल्या वर्षातील आठ हजार विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याची जबाबदारी शाळांबरोबरच यंत्रणेचीदेखील आहे. तथापि याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा पालकांचा आरोप आहे.सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने राज्यातील आदिवासी विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत शिष्यवृत्तीचा निधी दिला जातो. शालेय विद्याथ्र्यापासून तर महाविद्यालयीन विद्याथ्र्यानाही शिष्यवृत्ती दिली जात असते. इयत्ता पहिली ते पाचवी र्पयतच्या विद्याथ्र्याना एक हजार तर सहावी ते दहावीर्पयतच्या विद्याथ्र्याना एक हजार 500 रुपये शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती दिली जाते. शालेय विद्याथ्र्याच्या शिष्यवृत्तीसाठी जिल्हा परिषदेकडे निधी वर्ग केला जात असतो. सन 2016-2017 मध्ये तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील 824 शाळांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. केवळ निम्याच शाळांनी प्रस्ताव सादर केले होते. शाळांनी हे सर्व प्रस्ताव ऑनलाईन सादर केले होते. यात तळोदा 130, अक्कलकुवा 310, धडगाव 249 या प्रमाणे शाळांची संख्या होती. शाळांच्या प्रस्तावानुसार 57 हजार 693 विद्याथ्र्याची शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करण्यात आली होती.या विद्याथ्र्यासाठी शिक्षण विभागाने सात कोटी 52 लाख 17 हजार 500 रुपयांचा निधी प्रकल्पाकडे मागितला होता. परंतु प्रत्यक्षात 46 हजार 652 विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती अदा करण्यात आली आहे. अर्थात या विद्याथ्र्याच्या ऑनलाईन प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याचे रक्कम प्रलंबीत ठेवल्याचे कारण शिक्षण विभागाने दिले आहे. सन 2015-2016 मध्येदेखील सात हजार 924 विद्याथ्र्याची शिष्यवृत्ती वेगवेगळ्या त्रुटीमुळे प्रलंबित ठेवण्यात आली आहे. वास्तविक प्रस्तावातील त्रुटी संबंधीत शाळांकडून तातडीने पूर्ण करून घेण्याची आवश्यकता  असतांना तब्बल दोन वर्षे होवूनही अजून पावेतो त्रुटीची पूर्तता न केल्यामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्याथ्र्याच्या शिष्यवृत्तीत गैरकारभार थांबवून त्यात पारदर्शीपणा आणण्यासाठी शासनाने ऑनलाईन प्रस्ताव दाखल करून थेट त्याच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचा चांगला निर्णय घेतला असला तरी या ऑनलाईनच्या भानगडीमुळे विद्याथ्र्याना दोन-दोन वर्षे शिष्यवृत्ती पासून वंचित राहावे लागत आहे. आदिवासी विद्याथ्र्याना वह्या, पुस्तके व ड्रेस खरेदीसाठी शासनाकडून शैक्षणिक वर्षाअखेर शिष्यवृत्ती            दिली जात असते. परंतु ही शिष्यवृत्ती त्यांना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शासनाचा उद्देशही सफल होत नसल्याची व्यथा पालकांनी बोलून दाखविली. आताही शैक्षणिक वर्ष पुढील महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे आदिवासी पालकांना आतापासूनच आपल्या पाल्याच्या शैक्षणिक खर्चाची चिंता आहे.  निदान शिक्षण विभागाने संबंधीत शाळांशी समन्वय ठेवून त्रुटींची तातडीने पूर्तता करून प्रलंबीत शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी,            अशी पालकांची मागणी              आहे.