शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

प्रतापपूर आरोग्य केंद्रांतर्गत 1 हजार बालके गोवर-रुबेलापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:10 IST

प्रतापपूर : तळोदा तालुक्यात यंदा प्रथमच निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे अनेक आदिवासी कुटूंबे गुजरात राज्यात स्थलांरित झाली आहेत़ त्यांच्या ...

प्रतापपूर : तळोदा तालुक्यात यंदा प्रथमच निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे अनेक आदिवासी कुटूंबे गुजरात राज्यात स्थलांरित झाली आहेत़ त्यांच्या या स्थलांतरामुळे प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 1 हजार बालके गोवर-रुबेला ‘लस’ पासून वंचित राहिल्याची माहिती समोर आली आह़े प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित प्रतापपूर, राणीपूर, खर्डी, बंधारा, टाकळी, अलवाण, नवागाव, बोरवाण, सावरपाडा, धनपूर, पाडळपूर, सिलींगपूर, रांझणी, सलसाडी, छोटा धनपूर, जांबाई, सितापावली आदी 50 गावे आणि 17 पाडय़ांचा समावेश आह़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागासह सपाटीवर असलेल्या गावांमधील एकूण 13 हजार 365 बालकांना गोवर-रुबेला लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले होत़े यांतर्गत 27 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर या काळात लसीकरण मोहिम राबवण्यात आली होती़ आरोग्य विभागाच्या पथकांनी या गावांमध्ये जाऊन 58 शाळा आणि 60 अंगणवाडय़ांमध्ये लसीकरण पूर्ण केले होत़े यातून 29 नोव्हेंबरअखेर प्रतापपूर आरोग्य केंद्रातून बाहेर पडणा:या पथकांनी 29 डिसेंबर्पयत केवळ  10 हजार 739 बालकांचे लसीकरण पूर्ण करत 80 टक्के उद्दीष्टय़ पूर्ण केल्याची माहिती आह़े उर्वरित 1 हजार 227 बालके ही पालकांसोबत गुजरात राज्यात स्थलांतरित झाल्याने त्यांचे लसीकरण रखडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आह़े या भागातून प्रथमच मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर झाल्याने बालकांना लसीकरणाचा लाभ मिळू शकलेला नाही़ दुस:या टप्प्यात लसीकरण न झालेल्या बालकांना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभाग करत आह़े परंतू मार्चनंतरही स्थलांतरित आदिवासी बांधव परत न आल्यास त्यांचे पाल्य कायमस्वरुपी लसीकरणापासून वंचित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत़ आरोग्य केंद्रांच्या पथकाने लसीकरणाची मोहिम चोखपणे बजावली असली तरीही एक हजार बालके वंचित राहिल्याने उद्दीष्टय़पूर्ती झालेली नाही़ येत्या काळात यातील काही बालकांची वयोमर्यादा पूर्ण झाल्यास त्यांना लस देणार किंवा कसे याकडेही लक्ष लागून राहणार आह़े सातपुडय़ातील राणीपूर, सितापावली, जांबाई, सावरपाडा, धनपूर यासह विविध गावांमधून मोठय़ा संख्येने आदिवासी बांधव कुटूंबियांना घेऊन गुजरातमध्ये गेले आहेत़ होळीसणावेळी ते परत आल्यास त्यांच्या पाल्यांवर लसीकरण करणे शक्य होणार असल्याचे आरोग्य केंद्रांकडून सांगण्यात येत आह़े आरोग्य विभागाने स्थलांतरितांना बोलावण्याचे नियोजनही कोलमडल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आह़े