शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

प्रतापपूर आरोग्य केंद्रांतर्गत 1 हजार बालके गोवर-रुबेलापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:10 IST

प्रतापपूर : तळोदा तालुक्यात यंदा प्रथमच निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे अनेक आदिवासी कुटूंबे गुजरात राज्यात स्थलांरित झाली आहेत़ त्यांच्या ...

प्रतापपूर : तळोदा तालुक्यात यंदा प्रथमच निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे अनेक आदिवासी कुटूंबे गुजरात राज्यात स्थलांरित झाली आहेत़ त्यांच्या या स्थलांतरामुळे प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 1 हजार बालके गोवर-रुबेला ‘लस’ पासून वंचित राहिल्याची माहिती समोर आली आह़े प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित प्रतापपूर, राणीपूर, खर्डी, बंधारा, टाकळी, अलवाण, नवागाव, बोरवाण, सावरपाडा, धनपूर, पाडळपूर, सिलींगपूर, रांझणी, सलसाडी, छोटा धनपूर, जांबाई, सितापावली आदी 50 गावे आणि 17 पाडय़ांचा समावेश आह़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागासह सपाटीवर असलेल्या गावांमधील एकूण 13 हजार 365 बालकांना गोवर-रुबेला लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले होत़े यांतर्गत 27 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर या काळात लसीकरण मोहिम राबवण्यात आली होती़ आरोग्य विभागाच्या पथकांनी या गावांमध्ये जाऊन 58 शाळा आणि 60 अंगणवाडय़ांमध्ये लसीकरण पूर्ण केले होत़े यातून 29 नोव्हेंबरअखेर प्रतापपूर आरोग्य केंद्रातून बाहेर पडणा:या पथकांनी 29 डिसेंबर्पयत केवळ  10 हजार 739 बालकांचे लसीकरण पूर्ण करत 80 टक्के उद्दीष्टय़ पूर्ण केल्याची माहिती आह़े उर्वरित 1 हजार 227 बालके ही पालकांसोबत गुजरात राज्यात स्थलांतरित झाल्याने त्यांचे लसीकरण रखडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आह़े या भागातून प्रथमच मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर झाल्याने बालकांना लसीकरणाचा लाभ मिळू शकलेला नाही़ दुस:या टप्प्यात लसीकरण न झालेल्या बालकांना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभाग करत आह़े परंतू मार्चनंतरही स्थलांतरित आदिवासी बांधव परत न आल्यास त्यांचे पाल्य कायमस्वरुपी लसीकरणापासून वंचित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत़ आरोग्य केंद्रांच्या पथकाने लसीकरणाची मोहिम चोखपणे बजावली असली तरीही एक हजार बालके वंचित राहिल्याने उद्दीष्टय़पूर्ती झालेली नाही़ येत्या काळात यातील काही बालकांची वयोमर्यादा पूर्ण झाल्यास त्यांना लस देणार किंवा कसे याकडेही लक्ष लागून राहणार आह़े सातपुडय़ातील राणीपूर, सितापावली, जांबाई, सावरपाडा, धनपूर यासह विविध गावांमधून मोठय़ा संख्येने आदिवासी बांधव कुटूंबियांना घेऊन गुजरातमध्ये गेले आहेत़ होळीसणावेळी ते परत आल्यास त्यांच्या पाल्यांवर लसीकरण करणे शक्य होणार असल्याचे आरोग्य केंद्रांकडून सांगण्यात येत आह़े आरोग्य विभागाने स्थलांतरितांना बोलावण्याचे नियोजनही कोलमडल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आह़े