शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

पाच वर्षात १ हजार ३२८ रक्तबॅगांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 12:16 IST

‘ब्लड आॅन कॉल’ : दुर्गम भागात रक्तदानाबाबत निरुत्साह, जनजागृतीची आवश्यकता

नंदुरबार : जीवन अमृत योजनेंतर्गत असलेल्या ‘ब्लड आॅन कॉल’ सेवेव्दारे २०१४ ते मार्च २०१९ म्हणजे जवळपासून पाच वर्षात केवळ १ हजार ३२८ रक्तबॅगांचा पुरवठा करण्यात आला आहे़ दुर्गम भागातील ग्रामस्थ रक्तदानात फारसे सक्रीय नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या सर्वच रक्तगटांचा तुटवडा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे़वाढते अपघात, गरोदरपण, लहान बालक आदींसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते़ त्यामुळे रक्तअभावी प्राणहानी होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून २०१४ पासून जीवन अमृत योजना सुरु करण्यात आली़ या अंतर्गत जिल्ह्यासामान्य रुग्णालयामार्फत नोंदणीकृत असलेल्या दवाखान्यांना मागणीनुसार रक्त बॅगांचा पुरवठा करण्यात येत असतो़ शहर हद्दीच्या ४० किमी अंतराच्या परीक्षेत्रात या रक्त बॅगांचा पुरवठा करण्यात येत असतो़ नंदुरबार तालुक्यात २८ नोंदणीकृत दवाखाने या योजनेअंतर्गत रक्त बॅगा पुरवठ्यास पात्र ठरतात़ शासकीय धोरणानुसार १०४ क्रमांकाला दूरध्वनी केल्यानंतर सुमारे अर्धा तासात रक्ताचा पुरवठा करणे बंधनकारक असते़ त्यानुसार, २०१४ साली १७० रक्त बॅगा पुरवण्यात आल्या़ त्याच प्रमाणे २०१५ - १२८, २०१६ - १४४, २०१७ - ११३ , २०१८-३७ तर मार्च २०१९ पर्यंत ७३६ रक्त बॅगांचा पुरवठा ‘ब्लड आॅन कॉल’व्दारे करण्यात आला आहे़शहरापासून ४० किमी अंतरांतर्गत असलेल्या एखाद्या रुग्णाला तत्काळ रक्ताची आवश्यकता असल्यास तो १०४ क्रमांकाच्या टोल फ्री नंबरला दूरध्वनी करुन रक्ताची मागणी करू शकतो़ त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून अर्धा तासाच्या आत संबंधित रुग्णाला रक्ताचा पुरवठा करण्यात येत असतो़ परंतु योजनेबाबत सर्वसामान्यांमध्ये माहिती नसल्याने अनेक लाभार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे़जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून गरोदर माता, लहान बाळ, पिवळे रेशन कार्डधारक, जेष्ठ नागरिक, सिकलसेलग्रस्त आदींसाठी मोफत रक्त बॅगांचा पुरवठा करण्यात येत असतो़ जवळपास ९० टक्के रक्त पुरवठा हा मोफत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा सामान्य प्रशासनाकडून देण्यात आली़ त्याच प्रमाणे इतर गरजुंना ठराविक रक्कम मोजून रक्तबॅग पुरवठा करण्यात येत असतो़ उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़ त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या मागणीनुसार रक्ताचा पुरवठा करण्यास प्रचंड प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत असते़अनेक वेळा दुर्गम भागात रक्तदान शिबिरे घेण्यात येत असतात़ परंतु त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसतो़ बोटावर मोजण्याइतकेच जण रक्तदानात सहभाग घेत असतात़ त्यामुळे रक्तदानात सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे़