शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

आंदेगाव येथील पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:45 IST

हिमायतनगर : आंदेगाव येथील पाणीपुरवठा योजना पाच वर्षांपासून अर्धवट काम पूर्ण करून देण्याची गावक-र्यांची मागणी नागरिक ...

हिमायतनगर : आंदेगाव येथील पाणीपुरवठा योजना पाच वर्षांपासून अर्धवट काम पूर्ण करून देण्याची गावक-र्यांची मागणी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील गावाची पाणी टंचाई लक्षात घेऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसाठी जवळपास १ कोटी २० लाख रुपयांची नळ योजना मंजूर झाली होती. सदरील योजनेचे काम गुत्तेदारांने जि.प.पाणी पुरवठा विभागाअंतर्गत सुरु केले होते. या कामाला पाच वर्षांचा कालावधी होत आहे. परंतु अद्यापपर्यंत काम अर्धवट स्थितीत आहे.

सदरील योजनेचे काम २०१५ पासून ठप्प असल्याने अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कुचकामी ठरली आहे. ग्रामस्थांना उन्हात पाणी टंचाई काळात इतरत्र भटकावे लागत आहे.

सदरील पाणीपुरवठा योजनेचे काम गुत्तेदारानी पाच पर्षांपूर्वी सुरुवात केली होती. यात पाणी साठवण एका टाकीचे व विहिरीचे काम पूर्ण झाले आहे आणि एक टाकी अर्धवट अवस्थेत असून पाईप लाइन बरोबर टाकली नाही असे जवळपास ५० टक्के काम अर्धवट स्थितीत आहे. उर्वरीत कामे लवकर सुरू करण्यात यावे या संदर्भात गावक-र्यांनी अनेक वेळा निवेदन देऊन मागणी केली होती तरी कामाला आजपर्यंत सुरूवात झाली नाही. यासंबंधीत अधिकारी व गुत्तेदाराशी पाणीपुरवठा योजनेचे काम का बंद पडले अशी विचारना केली असता ते नेहमी उडवाउडवीचे उत्तर देऊन वेळ मारून नेत असल्याचे गावातील दयानंद थोटे यांनी सांगितले.

रखडलेली योजना लवकरात लवकर सुरु करावी अन्यथा आम्हा ग्रामस्थांना लोकशाही मार्गाचा वापर करून आंदोलन करणार असल्याचे गावातील जेष्ठ नागरिक माधवराव थोटे, पोलीस पाटील निळकंठे, माजी सरपंच दत्ता लक्ष्मण गटकवाड, सेवानिवृत्त फौजी, चिमणाजी थोटे, दया थोटे, लक्ष्मण बड्डेवाड, रामदास पोलसवाड यांनी सांगितले.