शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कोणीही असो, कायदेशीर कारवाई होणारच- नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:23 IST

केंद्र सरकारवर टीका करताना भाजप सरकारने ७ वर्षांत पूर्ण देश विकायला काढल्याची परिस्थिती असल्याचे सांगितले. देशाचा विकासदर रोज खाली ...

केंद्र सरकारवर टीका करताना भाजप सरकारने ७ वर्षांत पूर्ण देश विकायला काढल्याची परिस्थिती असल्याचे सांगितले. देशाचा विकासदर रोज खाली येत आहे. केंद्राच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचा फटका सामान्यांना बसत आहे. त्याचवेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही राजीनामा देऊन जात आहेत. कोरोनाचे संकट देशात असताना मोदी सरकारने डब्ल्यूएचओच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करीत पाच राज्यातील निवडणुका घेतल्या. त्याचवेळी अमेरिकेच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम घेऊन देशात कोरोनाचा फैलाव केला, अशी टीकाही त्यांनी केली.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यातही केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. दिल्लीच्या सीमेवर १० महिन्यांपासून शेतकरी तळ ठोकून आहेत. त्यांच्या प्रश्नांवर बोलायला केंद्र सरकार तयार नसल्याचेही प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले. काँग्रेसने हाती घेतलेल्या व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान या कार्यक्रमाबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.

राज्यात दस्त नोंदणी होत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र हा निर्णय न्यायालयाच्या आदेशानंतर अस्तित्वात असलेल्या कायद्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. या विषयावर तोडगा काढू असेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील, सहप्रभारी संपतकुमार आदींची यावेळी उपस्थिती होती.