शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

सुशिक्षित बेरोजगारांच्या मानसिक खच्चीकरणाची जबाबदार कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:20 IST

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरात जवळपास ६ हजार २०० जागांसाठी उमेदवारी अर्ज मागविले होते. यामध्ये आरोग्य विभागातील गट ...

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरात जवळपास ६ हजार २०० जागांसाठी उमेदवारी अर्ज मागविले होते. यामध्ये आरोग्य विभागातील गट क व गट ड पदांचा समावेश होता. त्यासाठी जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. या भरतीप्रक्रियेसाठी नांदेड जिल्ह्यात ७३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले होते. त्याअनुषंगाने परीक्षा केंद्र परिसरात १४४ कलमही लागू केल्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते, तर ज्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याबाहेरील जागांसाठी अर्ज केले होते. त्यांनी संबंधित शहरात परीक्षेसाठी जाण्यासाठी रेल्वेची तिकिटेही बुक केली होती. काही परीक्षार्थी रेल्वे प्रवासात असताना त्यांना परीक्षा रद्द झाल्याचे मॅसेज आले. परंतु, अनेकांना ही अफवा असल्याचे वाटू लागल्याने हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षा स्थळ गाठले. परीक्षा घेण्याचे काम करणाऱ्या संस्थेने ऐनवेळी परीक्षेची तयारी झाली नसल्याचे सांगणे आणि परीक्षा रद्दचा निर्णय घेणे ही बाब विद्यार्थ्यांना रुचली नसल्याने अनेक विद्यार्थी संघटनांनी शासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवीत, संबंधित संस्थेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एका विद्यार्थ्याचे वेगवेगळे अर्ज

शासनाकडून गुणानुक्रमे उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया रद्द केली. त्यात परीक्षेचे काम दिलेल्या संस्थेने वेगवेगळ्या पदांसाठी प्रत्येकी ८०० रुपयांप्रमाणे शुल्क वसूल केले आहे. काही विद्यार्थ्यांनी चार पदांसाठी अर्ज दाखल केले, त्यांना ३२०० रुपये शुल्क भरावे लागले. यासह विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी काढलेले रेल्वे तिकीट, त्यांच्या येण्या-जाण्यासह राहण्याचा, जेवणाचा खर्च असा प्रति विद्यार्थी किमान हजार ते दीड हजार रुपयांचा भुर्दंड हजारो विद्यार्थ्यांना सहन करावा लागला आहे. अनेक जणांचे औरंगाबादला परीक्षा केंद्र आल्याने त्यांनी एकदिवस अगोदरच औरंगाबाद गाठले होते, तर काही विद्यार्थी प्रवासात होते.

उत्तीर्ण होण्यासाठीचीही सेटिंग

आरोग्य विभागातील गट क आणि ड साठी रविवारी आणि सोमवारी आयोजित परीक्षांमध्ये उत्तीर्ण करून देण्याची हमी देत अनेक उमेदवारांकडे पैशाचीही मागणी करण्यात आली होती. पंधरा लाख रुपयांत परीक्षा उत्तीर्ण करण्यापासून ते नियुक्ती देण्यापर्यंतचे नियोजन करू, असे आश्वासन काही मंडळींकडून मिळत होते. यासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी तक्रार करीत संतापही व्यक्त केला होता. तसेच परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची मागणीही केली होती.