शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

नुसती सहानुभूती काय कामाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:23 IST

ढगफुटीमुळे तालुक्यातील सावरगाव(न), बेरळी, देऊळगाव, मंगरूळ, बोरगाव, पांगरी, आडगाव, काबेगाव, हिप्परगा, आदी गावांतील कापूस, सोयाबीन, हळद, ज्वारी या पिकांमध्ये ...

ढगफुटीमुळे तालुक्यातील सावरगाव(न), बेरळी, देऊळगाव, मंगरूळ, बोरगाव, पांगरी, आडगाव, काबेगाव, हिप्परगा, आदी गावांतील कापूस, सोयाबीन, हळद, ज्वारी या पिकांमध्ये पाण्याचे तळे साचले असून, काही ठिकाणी पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे तालुक्यात कही खुशी, कही गम अशी परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी प्रभारी तहसीलदार राम बोरगावकर यांना पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. मंडल अधिकारी व तलाठी यांचे पंचनामे करण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. ढगफुटीमुळे अनेक गावांतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते व पूल वाहून गेले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला एका नवीन त्रासाला समोर जावे लागत आहे.

विधानपरिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सावरगाव (न) येथे झालेल्या ढगफुटीमुळे वाहून गेलेल्या कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता अशोकराव यांनी सावरगाव(न) येथील पुलाची उंची वाढवण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले. मात्र, तालुक्यातील धानोरा (मक्ता) येथे देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली. मात्र, नदीवर पूल नसल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीला तीन ते चार फूट पाण्यातून दफनविधीसाठी न्यावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तालुक्यातील विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे धानोरा (मक्ता) नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

लोहा तालुक्यात पीआरसी समितीची भेट

तालुक्यात पीआरसी समितीत गटप्रमुख आमदार अनिल पाटील, आमदार किशोर दराडे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांनी भेट दिली असून, यात आरोग्य, हागणदारीमुक्त, पाणीपुरवठा, घरकुल या विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंबंधी गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. समितीने शिक्षण पशुसंवर्धन या विभागाचे कौतुक केले आहे.

सणासुदीच्या काळात पोलिसांच्या वतीने नागरिकांना आव्हान

तालुक्यात घरफोडी, मोटारसायकल, मोबाईल चोरी वाढल्यामुळे नागरिकांनी सणासुदीच्या काळात सतर्क राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनात लोहा ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, सोनखेडचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, उस्माननगरचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी आपल्या हद्दीतील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली. यातच माळाकोळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांनी आरोपी हरिओम मुंडे, रा. एकुर्का (खु), ता. जळकोट याच्याकडून सात मोटारसायकली जप्त केल्या. त्यामुळे तालुक्यातील अन्य मोटारसायकलची चोरी उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे.