शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने टरबूज उत्पादकांना काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:33 IST

महाराष्ट्रातील काही भागात संचारबंदी व धारा १४४ लागू केल्याने टरबूज व खरबुजाची मागणी मंदावली आहे. यामुळे टरबुजाच्या दरात घट ...

महाराष्ट्रातील काही भागात संचारबंदी व धारा १४४ लागू केल्याने टरबूज व खरबुजाची मागणी मंदावली आहे. यामुळे टरबुजाच्या दरात घट झाली आहे. मागील वर्षात जशी लॉकडाऊनची मर्यादा वाढतच गेल्याने शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला होता. पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली, तर टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.

अर्धापूर तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज फळपिकांची लागवड केली आहे, तसेच यावर्षी टरबूज व खरबूज पिकासाठी पोषक वातावरण असल्याने तालुक्यात फळपिकांचे क्षेत्रात वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टरबुजाची लागवड केली होती. ती आता तोडण्यात आली आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी माल खरेदीसाठी येत नसल्याने आणि खरेदी केले तरी कमी दर देत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत .

काही शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टरबुजाची लागवड केली आहे. ती काही दिवसांनंतर तोडणीस येणार आहेत; परंतु दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने देशात किंवा महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकऱ्यांनी धसकी घेतली आहे.

चौकट

गेल्या महिन्यात टरबूज पिकाला मोठ्या प्रमाणात मर रोगाची लागण झाली होती. शेतकऱ्यांनी महागडी औषधी वापरून मर रोगाला आटोक्यात आणले, तर काही शेतकऱ्यांचे टरबुजाचे प्लांटचे प्लांट वाळून गेले. मर रोगापासून बचावलेल्या टरबुजाला आता कोरोनाकाळामध्ये दर मिळतो की नाही, हा प्रश्न उभा राहिला आहे. लॉकडाऊन लागले तर टरबूज व खरबूज उत्पादकांना आर्थिक फटका बसणार आहे.