शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने टरबूज उत्पादकांना काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:33 IST

महाराष्ट्रातील काही भागात संचारबंदी व धारा १४४ लागू केल्याने टरबूज व खरबुजाची मागणी मंदावली आहे. यामुळे टरबुजाच्या दरात घट ...

महाराष्ट्रातील काही भागात संचारबंदी व धारा १४४ लागू केल्याने टरबूज व खरबुजाची मागणी मंदावली आहे. यामुळे टरबुजाच्या दरात घट झाली आहे. मागील वर्षात जशी लॉकडाऊनची मर्यादा वाढतच गेल्याने शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला होता. पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली, तर टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.

अर्धापूर तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज फळपिकांची लागवड केली आहे, तसेच यावर्षी टरबूज व खरबूज पिकासाठी पोषक वातावरण असल्याने तालुक्यात फळपिकांचे क्षेत्रात वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टरबुजाची लागवड केली होती. ती आता तोडण्यात आली आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी माल खरेदीसाठी येत नसल्याने आणि खरेदी केले तरी कमी दर देत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत .

काही शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टरबुजाची लागवड केली आहे. ती काही दिवसांनंतर तोडणीस येणार आहेत; परंतु दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने देशात किंवा महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकऱ्यांनी धसकी घेतली आहे.

चौकट

गेल्या महिन्यात टरबूज पिकाला मोठ्या प्रमाणात मर रोगाची लागण झाली होती. शेतकऱ्यांनी महागडी औषधी वापरून मर रोगाला आटोक्यात आणले, तर काही शेतकऱ्यांचे टरबुजाचे प्लांटचे प्लांट वाळून गेले. मर रोगापासून बचावलेल्या टरबुजाला आता कोरोनाकाळामध्ये दर मिळतो की नाही, हा प्रश्न उभा राहिला आहे. लॉकडाऊन लागले तर टरबूज व खरबूज उत्पादकांना आर्थिक फटका बसणार आहे.