शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

पाणीपुरवठा, प्राधिकरण कार्यकारी अभियंत्यावर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 01:22 IST

मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत मागील दोन वर्षापासून तब्बल १०० कोटी रुपये अखर्चित असल्याची बाब विधी मंडळातील लक्षवेधी पुढे आल्यानंतर या प्रकरणात जिल्ह्यातील जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.

ठळक मुद्देपेयजल योजनेचा निधी अखर्चित ठेवणे भोवले

नांदेड : मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत मागील दोन वर्षापासून तब्बल १०० कोटी रुपये अखर्चित असल्याची बाब विधी मंडळातील लक्षवेधी पुढे आल्यानंतर या प्रकरणात जिल्ह्यातील जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही बाब आ. अमरनाथ राजूरकर यांनी विधी मंडळात लक्षवेधीमध्ये मांडली. विधी मंडळाच्या नियम १०१ अंतर्गत लक्षवेधी मांडताना आ. राजूरकर यांनी जिल्ह्यात मुख्यमंत्री पेयजल अंतर्गत दोन वर्षापासून जवळपास १०० कोटी रुपयांचा निधी पडून असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. एकीकडे जिल्ह्यातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत असताना निधी मात्र खर्च केला जात नाही. ही बाब गंभीर असल्याचे ते म्हणाले. ग्रामपंचायतीकडून ठराव दिल्यानंतरही टँकर तसेच अन्य पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव वेगवेगळ्या ठिकाणी मंजुरीसाठी पाठवावे लागत आहेत. त्यामुळे हे अधिकार तहसीलदारस्तरावर द्यावेत, अशी मागणीही आ. राजूरकर यांनी विधान परिषदेत केली. याबाबत दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यांच्या मागणीला भाई जगताप, सुरेश धस, विक्रम काळे, सतीष चव्हाण, रामहरी रुपनवर व विनायक मेटे यांनी पाठींबा दिला.या प्रश्नावर उत्तर देताना जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे सांगताना पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी टँकर व अन्य पाणी पुरवठा योजना मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना दिले असल्याचे सांगितले. या प्रकरणातील जीवन प्राधिकरण आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.पाणीपुरवठ्यासंबंधीचे अधिकार तहसिलदारांनाजिल्ह्यातील ज्या शेतक-यांच्या विहिरी व बोअरवेल पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित केले आहेत त्यांना अनेक महिने पैसे मिळत नाहीत. दोन महिने शासनाने या यंत्रणेचा वापर केल्यानंतर एकाच महिन्याचे पैसे दिले जातात. ही बाब गंभीर असल्याचे आ. राजूरकर यांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना तात्काळ पैसे देण्याचे मंत्र्यांनी मान्य केले. नांदेड जिल्ह्यातील मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये दिरंगाई करणा-या अधिका-यांवर कारवाईसह पिण्याच्या पाण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार तहसीलदारांना प्रदान करण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडGovernmentसरकारBabanrao Looneykarबबनराव लोणीकर