शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीक्षेत्र माहूर : नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडणारा तालुका म्हणून माहूरची ओळख आहे, परंतु गतवर्षात ...

ठळक मुद्देमाहूर तालुका : गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पैनगंगा नदी कोरडीठाक

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडणारा तालुका म्हणून माहूरची ओळख आहे, परंतु गतवर्षात तालुक्यात अत्यल्प म्हणजे केवळ ५०१़७५ मि़मी़ पाऊस झाला. परिणामी तालुक्याची जलवाहिनी असलेली पैनगंगा नदी डिसेंबर महिन्यामध्येच कोरडीठाक पडल्याने तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे़ तर तालुक्यातील अनेक गावे, वाडी, तांडे येथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे़एरव्ही तालुक्यात सरासरी १२०० मि़मी़ पावसाची नोंद होत होती़ तर गतवर्षी तालुक्यात अत्यल्प ५०१़७५ मि़मी़ पाऊस पडला़ तालुक्यात मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत शेततळी, मातीनाला बांध यासारखी अनेक कामे अंदाजपत्रकानुसार न करता नको त्याच ठिकाणी केल्याने पावसाळ्यात अल्प प्रमाणात पडलेले पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून गेले. त्यामुळे फेब्रुवारीपासूनच तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे़ तालुक्यात एकूण ६२ ग्रामपंचायती आहेत़ तर ६२ ग्रामपंचायतीअंतर्गत ९२ गावांचा समावेश असून त्यापैकी मांडवा व वसरामनाईक तांडा या दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़मुरली गटग्रामपंचायतीमधील नखेगाव येथे तीव्र पाणीटंचाई असल्याने येथील विहीर अधिग्रहण प्रस्ताव सादर केला असून प्रस्तावास ग्रामपंचायत संबंधित विस्तार अधिकाºयांचा पंचनामा अप्राप्त असल्याने नखेगाव येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़१५ गावांतील विहिरींचे अधिग्रहणवायफनी, रुई, रुपानाईक तांडा, दिगडी कु़, कळसिंग तांडा, तोळातांडा, पानोळा, मांडवा, वसराम नाईक तांडा, जिवलानाईक तांडा, हिवळणी, पवनाळा, वाई, जगुनाईक तांडा,सतीगुडा या १५ गावांतील विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे़ तर दिघडी, पानोळा, सावरखेड या तीन गावांना बोअर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला आहे़ तालुक्यातील अन्य ग्रामीण भागात पाणीटंचाईने नागरिकांचे हाल होत आहेत़