शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘त्या’ धैर्यामागे केवळ माणुसकी होती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:07 IST

विशाल सोनटक्के । लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : आपल्या हातून काही मोठे कार्य झाले याचा लवलेश ना त्याच्या चेहºयावर ...

ठळक मुद्देशौर्य पुरस्कार जाहीर झालेल्या एजाजला जायचेय लष्करात

विशाल सोनटक्के ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आपल्या हातून काही मोठे कार्य झाले याचा लवलेश ना त्याच्या चेहºयावर ना त्याच्या बोलण्यात़ आठ महिन्यांपूर्वीची ती घटना आठवल्यानंतर आजही मी अस्वस्थ होतो़ साहेब दोघींना वाचविल्याचे समाधान आहे. मात्र, काही मिनिटे अगोदर नदीवर पोहोचलो असतो तर आणखी दोघींनाही वाचविता आले असते़ काही मिळेल म्हणून मी पाण्यात उडी मारली नव्हती़, तर त्या धैर्यामागे केवळ माणुसकी होती़

अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील एजाज अ़रऊफ नदाफ ‘लोकमत’शी बोलत होता. जीवाची पर्वा न करता वाहुन जाणाºया दोन तरुणींना वाचविले़ या धैर्याबद्दल एजाजला राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार २०१७ जाहीर झाला आहे़ यंदा हा पुरस्कार मिळविणारा एजाज हा महाराष्ट्रातील एकमेव असून २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एजाजचा गौरव होणार आहे़ गुरुवारी सकाळीच एजाजशी संवाद साधण्यासाठी थेट अर्धापूर तालुक्यातील पार्डी गाठले़ पार्डीत पोहोचल्यानंतर पानटपरीचालकाला एजाज बद्दल विचारले असता़ ‘एजाज अभीच घर गया, दो मिनीट रुको, उसे बुलाता हु़’ असे सांगत पानटपरी चालक तरुणाने उत्साहात एजाजला फोन करुन पानटपरीवर बोलविले़ पानटपरी चालक सोहेल शेख आणि त्याचा मित्र शेख समीरने सोहेलची कामगिरी सांगण्यास सुरुवात केली़ त्या दुर्घटनेत माझी आत्याची मुलगी सुमय्या (१६) हीचा बुडून मृत्यु झाला़ मात्र तिच्या सोबत असलेल्या दोघींना एजाजने मोठ्या धाडसाने वाचविले़ काही वेळातच एजाज पोहोचला़

एजाजच्या घरची परिस्थिती विलक्षण हलाकीची़ आईवडील बटईने घेतलेल्या शेतात दिवसरात्र राबतात़ त्यातुनही वेळ काढुन दोन पैशाच्या आशेने वडील होमगार्डची ड्युटी करतात़ गरीबीमुळेच मोठ्या भावाचे शिक्षण अर्धवट राहिलेले़ आता तोही शेतात आई, वडीलांसोबत राबत आहे़ घरी गेल्याबरोबर एजाज आईजवळ जाऊन बसला आणि ३० एप्रिल २०१७ रोजी घडलेली घटना डोळ्यासमोर उभी केली. दहावीत शिकणाºया एजाजला राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार जाहीर झाल्याचे अप्रूप ग्रामस्थांनाही आहे़ कालच तहसीलदार अरविंद नर्सीकर यांनी पार्डी येथे जाऊन एजाजचा सत्कार केला़ गुरुवारी एजाज शिकत असलेल्या पार्डीतील राजाबाई हायस्कूलमध्येही शाळेच्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला़

दोघींना वाचवू शकलो नसल्याची खंत...त्या दिवशी नातेवाईकाचे लग्न होते़ दुपारच्या वेळी जेवण उरकून घराकडे निघालो असताना नदीकडून १०-१५ जण ओरडत येत असल्याचे पाहिले़ काय झाले म्हणून मी विचारत होतो़ मात्र काहीही समजले नाही़ नदीकडे काहीतरी झाले एवढेच लक्षात आले़ नदीच्या काठी बंधाºयासाठी मोठे खड्डे खोदले होते़ दुपारच्या वेळी तेथे गावातील बायका धुणी धुण्यासाठी जायच्या. त्यातल्याच काहीजणी नदी नजीकच्या त्या खड्ड्यात पडल्याचे कळले़ कसलाही विचार न करता पळत जाऊन मी पाण्यात उडी मारली़ सुरुवातीला आफरीन शेख (३२) यांना पाण्यातून बाहेर काढले़ त्यानंतर पुन्हा त्या पाण्यात उडी मारुन तबस्सूम शेख (१८) यांनाही वाचविण्यात मला यश आले़ मात्र त्याचवेळी आणखी दोघी पाण्यात बुडाल्या होत्या़ मी पाण्यात उडी मारुन त्यांचा शोध घेत असताना़ गावातील काही जण मदतीसाठी पुढे आले़ त्यांनीही पाण्यात उड्या मारल्या़ मात्र अफसर आणि शेख सुमय्या यांचा शोध लागला नाही़ साधारण अर्ध्या तासानी सुमय्याला बाहेर काढण्यात मला यश आले़ मात्र तिचा मृत्यू झाला होता़ या घटनेत अफसर शेख (३०) या महिलेचाही मृत्यू झाला़ दोघींना वाचविण्यात यश आले़ मात्र दोघींचा मृत्यू झाला़ त्याची खंत आजही वाटते़- एजाज अ़रऊफ नदाफ

एजाजला शिकवून मोठे करणार...आजच एका शिक्षकाने एजाजला डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक भेट दिले. मोठ्या मुलाला शिक्षण देता आले नाही़ ती कमी मी एजाजला शिकवून पूर्ण करणार आहे. त्याला शिकवून मोठे करणार आहे. - शमिम बेगम, एजाजची आई