शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित बियाणांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST

नांदेड : शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, अतिशय मोजक्या शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळत ...

नांदेड : शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, अतिशय मोजक्या शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळत असल्याने सदर योजना असून अडचण नसून खोळंबा, अशीच म्हणावी लागेल. जवळपास ५६ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून साडेतीन हजार शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढले असून जवळपास साडेआठ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवर खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असतो. परंतु, गतवर्षी सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा अनुदानित बियाणे खरेदीसाठी नोंदणी केली आहे. अनुदानित बियाणे अत्यल्प दराने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. परंतु, ते सर्वांनाच उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. आजघडीला नांदेड जिल्ह्यात ५६ हजार ३५८ शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे खरेदीसाठी नोंदणी केली आहे. परंतु, शुक्रवारी काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये केवळ ३ हजार ७०० जणांचीच निवड करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित ५० हजारावर शेतकऱ्यांना बियाणे मिळणार की नाही, असा प्रश्न नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पडला आहे.

जिल्ह्यात ५६ हजार अर्ज

नांदेड जिल्ह्यात अनुदानित बियाणे खरेदी करण्यासाठी ५६ हजार ३५८ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये सर्वाधिक ९ हजार ६५० अर्ज मुखेड तालुक्यातून आहेत. त्याचबरोबर अर्धापूर तालुक्यातून ७०६, भोकर - ३०४६, बिलोली - ३०८८, देगलूर - ५५८९, धर्माबाद - १४५३, हदगाव - ६२१८, हिमायतनगर - १५९८, कंधार - ४०७०, किनवट - ३६८६, लोहा - ५१३२, माहुर - २९९४, मुदखेड - ८६५, नायगाव - ५५१९, नांदेड - ११०४, तर उमरी तालुक्यातून ८७४ अर्ज आले आहेत.

निवड झालेल्यांना येणार एसएमएस

नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे मिळावे म्हणून नोंदणी केली आहे. परंतु, प्रत्येक शेतकऱ्यास हे बियाणे मिळणार नसून केवळ लॉटरी पद्धतीने नावे निघालेल्या शेतकऱ्यांनाच बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये सोयाबीन, उडीद आणि तुरीचेच बियाणे उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सर्वाधिक सोयाबीन बियाणास मागणी आहे.

निवड झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून एसएमस पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना महाबीजचे बियाणे खरेदी करता येणार आहे. जवळपास १२०० रुपये प्रति क्विंटल या दराने सदर बियाणे मिळणार आहे. एसएमएस आला तरच आपली लॉटरी लागली, असे शेतकऱ्यांनी समजावे.

सोयाबीनसाठी सर्वाधिक अर्ज

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून अत्यल्प दराने अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, शेतकऱ्यांची निवड खूप कमी केली जात असल्याने बहुतांश गावांत अनुदानित बियाणे एकाही शेतकऱ्यास मिळत नाही, असेही चित्र आहे. कडधान्य, गळीतधान्य आणि पौष्टिक तृणधान्याची बियाणे उपलब्ध करून दिली जात आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यात पुढील आठ दिवसात सोयाबीन, उडीद आणि तुरीचे बियाणे देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुदानित बियाणे मिळावे म्हणून अर्ज केला आहे. परंतु, अद्याप तरी कोणताही एसएमएस आलेला नाही. या ठिकाणी ओळखीने अथवा राजकीय नेत्यांच्या शिफारशीचे बियाणे दिले जाते. त्यामुळे आम्हाला बियाणे उपलब्ध होईल की नाही, अशी शंका आहे.

- तुकाराम सूर्यवंशी, शेतकरी.

मागील चार वर्षांपासून नियमितपणे अर्ज करून नोंदणी करतो. परंतु, आजपर्यंत अनुदानित बियाणे मिळाले नाही. खासगी व्यापाऱ्यांकडून घेतलेले बियाणे बोगस निघाल्याने शासनाच्या महाबीजचे बियाणे खरेदी करण्याचा विचार आहेत. परंतु, लॉटरीमध्ये नाव लागले तरच. अन्यथा घरगुती बियाणांची पेरणी करून पीक घ्यावे लागणार आहे.

- पुरभाजी कदम, शेतकरी.