शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वासाठी आणखी वर्षभर प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:23 IST

नांदेड : नागपूर-बाेरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे यवतमाळ, नांदेड, लातूर जिल्ह्यातील काम पूर्णत्वास जाण्यासाठी मार्च २०२३ ची प्रतीक्षा करावी लागणार ...

नांदेड : नागपूर-बाेरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे यवतमाळ, नांदेड, लातूर जिल्ह्यातील काम पूर्णत्वास जाण्यासाठी मार्च २०२३ ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. २४० किमी लांबीच्या या मार्गाचे काम आता मे पासून सुरू झाले आहे. नागपूर-बाेरी-तुळजापूर हा ५५० किमीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यातील बाेरी ते महागाव पर्यंत सुमारे ३१० किमी मार्गाचे चाैपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दिलीप बिल्डकाॅन या एकाच कंपनीने चारही पॅकेज घेऊन हे काम पूर्ण केले. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव ते लातूर जिल्ह्यातील औसा या २४० किमीच्या महामार्गाचे काम रखडले हाेते. या कामांचे चार पॅकेज करण्यात आले आहेत. त्यातील महागाव ते वारंगा फाटा हे काम सद्भाव कंपनीला देण्यात आले. इतर तीन कामांचे पॅकेज औरंगाबाद व कल्याणच्या कंपनीकडे आहे. कल्याणच्या कंपनीकडे चाकूर-लाेहा-वारंगा हे दाेन पॅकेज आहेत. महागाव ते औसा या मार्गातील ९० टक्के भूसंपादन झालेले आहे.

चाैकट....

ऐन पावसाळ्यात वाढला त्रास

काेराेना, लाॅकडाऊन अशा अडचणींमुळे हे काम थांबले हाेते. यावर्षी मे पासून या कामाला सुरूवात झाली आहे. विकास कामे सुरू असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. त्यातच पावसाळ्यात या अडचणींमध्ये आणखी भर पडते. हे काम विलंबाने सुरू झाले असले तरी गतिमानतेने पूर्ण केले जाईल, असे सांगितले जाते.

चाैकट....

चार ठिकाणी हाेणार वसुली

मार्च २०२३ पर्यंत महागाव ते औसा पर्यंतचे महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कंत्राटदार कंपन्यांना निश्चित करून देण्यात आले आहे. २४० किमीच्या या मार्गावर लातूर जिल्ह्यातील आष्टापूर, नांदेडमधील माळेगाव यात्रा, अर्धापूर तालुक्यातील पार्डी आणि महागाव तालुक्यातील बिजाेरा या चार ठिकाणी टाेल टॅक्स वसुली नाके उभारले जाणार आहेत.

आठपैकी चार पॅकेज पूर्ण

नागपूर ते तुळजापूरपर्यंत महामार्ग निर्माणाचे एकूण आठ पॅकेज आहेत. त्यापैकी चार पूर्ण झाले आहेत. साडेतीन ते चार हजार काेटी रूपये या महामार्गाचे बजेट आहे. या मार्गावरील अर्धवट स्थितीत असलेली कामे पूर्ण करून वेगवान कनेक्टिविटी निर्माण केली जाणार आहे.

काेट

२४० किमीच्या महागाव ते औसा राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यातील अडचणी तातडीने साेडवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला जाईल.

- सुनील पाटील,

प्रकल्प संचालक,

राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, नांदेड