शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

स्थलांतरास ग्रामस्थांनी वेळ घेतला; साडेतीन तासांत लेंडी प्रकल्पात ८ मीटरने पाणी वाढल्याने घात

By शिवराज बिचेवार | Updated: August 23, 2025 19:37 IST

लेंडी आंतरराज्यीय प्रकल्प; तीन महिन्यांपूर्वीच स्थलांतराच्या नोटिसा

नांदेड : लेंडी आंतरराज्यीय प्रकल्पाच्या घळ भरणीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाची जोता पातळी ही ३८८ मीटर होती. अनपेक्षित पर्जन्यमान किंवा अतिवृष्टी झाल्यास बुडीत क्षेत्रातील सात गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असून, ग्रामस्थांनी तातडीने नव्या गावठाण येथे स्थलांतरित व्हावे, अशा नोटिसा लेंडी प्रकल्प विभागाने मे महिन्यातच ग्रामस्थांना दिल्या होत्या. परंतु त्यानंतर संघर्ष समितीकडून स्थलांतरासाठी वेळ मागून घेण्यात आला. त्यात रविवारी रात्री अवघ्या साडेतीन तासांत प्रकल्पाची पाणीपातळी आठ मीटरने वाढल्याने ही गावे पाण्याखाली गेली.

लेंडी प्रकल्पाच्या घळ भरणीचे काम करताना मुख्य नदीपात्रात मातीकाम पूर्णसंचय पातळीपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. जोता पातळी ३८८ मीटर असून, पूर्णसंचय पातळी ही ३९६ मीटर आहे. मान्सूनपूर्व काळापासून प्रकल्पाचे १४ वक्रद्वार उघडून ठेवण्यात आले होते. बुडीत क्षेत्रातील गावांच्या सुरक्षिततेसाठी एक सांडवा जोता पातळीच्या ६.५ मीटरने खाली म्हणजे ३८१.५ मीटरवर ठेवण्यात आला होता.

१७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत धरणातील पाणीपातळी ही ३८३.५० मीटर होती. त्यात रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत बाऱ्हाळी भागात ३५४.८ मि.मी., रावणकाेळा २२२ मि.मी., मुक्रमाबाद २०६.८ मि.मी., लेंडी धरणस्थळ ९५ मि.मी., वाढोणा ८३ मि.मी. आणि जांब भागात ५४.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. रात्री १ ते ३ वाजेदरम्यान ढगफुटी झाली. परिणामी धरण क्षेत्रातील रावणगाव, भिंगोली, भासवाडी, भेंडेगाव खु., वळंकी, भाटापूर, हसनाळ व मारजवाडी या गावांत पाणी शिरले.

१७ ऑगस्टला मध्यरात्री धरणाची पाणीपातळी ३८३.५० मीटर होती. त्यात साडेतीन तासांत अचानक ८ मीटरने वाढ होऊन ती ३९१.५० मीटरपर्यंत गेली होती. प्रकल्पाची एकूण क्षमता ५.१२ टीएमसी असून, अवघ्या दोन तासांत प्रकल्पात ५० टक्क्यांहून अधिक म्हणजेच २.४७ टीएमसीपेक्षा अधिक पाणी आले. परिणामी या पाण्याने बुडीत क्षेत्रातील गावांना आपल्या कवेत घेतले.

१६ मे रोजी स्थलांतराच्या नोटिसालेंडी प्रकल्पाकडून हासनाळ प.मू. येथील ग्रामस्थांना १६ मे रोजी स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यात दगडी धरणाची पाणीपातळी ३८८ मीटर राहणार असून, या पातळीला काही गावे बुडीत होऊन बाधित होणार आहेत. त्यामुळे साहित्य, गुरे-ढोरे घेऊन नवे गावठाण या ठिकाणी दिलेल्या भूखंडावर स्थलांतरित व्हावे, असे त्यात नमूद आहे. परंतु त्यानंतरही ग्रामस्थांनी गाव सोडले नव्हते.

टॅग्स :floodपूरNandedनांदेड