शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरास ग्रामस्थांनी वेळ घेतला; साडेतीन तासांत लेंडी प्रकल्पात ८ मीटरने पाणी वाढल्याने घात

By शिवराज बिचेवार | Updated: August 23, 2025 19:37 IST

लेंडी आंतरराज्यीय प्रकल्प; तीन महिन्यांपूर्वीच स्थलांतराच्या नोटिसा

नांदेड : लेंडी आंतरराज्यीय प्रकल्पाच्या घळ भरणीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाची जोता पातळी ही ३८८ मीटर होती. अनपेक्षित पर्जन्यमान किंवा अतिवृष्टी झाल्यास बुडीत क्षेत्रातील सात गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असून, ग्रामस्थांनी तातडीने नव्या गावठाण येथे स्थलांतरित व्हावे, अशा नोटिसा लेंडी प्रकल्प विभागाने मे महिन्यातच ग्रामस्थांना दिल्या होत्या. परंतु त्यानंतर संघर्ष समितीकडून स्थलांतरासाठी वेळ मागून घेण्यात आला. त्यात रविवारी रात्री अवघ्या साडेतीन तासांत प्रकल्पाची पाणीपातळी आठ मीटरने वाढल्याने ही गावे पाण्याखाली गेली.

लेंडी प्रकल्पाच्या घळ भरणीचे काम करताना मुख्य नदीपात्रात मातीकाम पूर्णसंचय पातळीपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. जोता पातळी ३८८ मीटर असून, पूर्णसंचय पातळी ही ३९६ मीटर आहे. मान्सूनपूर्व काळापासून प्रकल्पाचे १४ वक्रद्वार उघडून ठेवण्यात आले होते. बुडीत क्षेत्रातील गावांच्या सुरक्षिततेसाठी एक सांडवा जोता पातळीच्या ६.५ मीटरने खाली म्हणजे ३८१.५ मीटरवर ठेवण्यात आला होता.

१७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत धरणातील पाणीपातळी ही ३८३.५० मीटर होती. त्यात रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत बाऱ्हाळी भागात ३५४.८ मि.मी., रावणकाेळा २२२ मि.मी., मुक्रमाबाद २०६.८ मि.मी., लेंडी धरणस्थळ ९५ मि.मी., वाढोणा ८३ मि.मी. आणि जांब भागात ५४.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. रात्री १ ते ३ वाजेदरम्यान ढगफुटी झाली. परिणामी धरण क्षेत्रातील रावणगाव, भिंगोली, भासवाडी, भेंडेगाव खु., वळंकी, भाटापूर, हसनाळ व मारजवाडी या गावांत पाणी शिरले.

१७ ऑगस्टला मध्यरात्री धरणाची पाणीपातळी ३८३.५० मीटर होती. त्यात साडेतीन तासांत अचानक ८ मीटरने वाढ होऊन ती ३९१.५० मीटरपर्यंत गेली होती. प्रकल्पाची एकूण क्षमता ५.१२ टीएमसी असून, अवघ्या दोन तासांत प्रकल्पात ५० टक्क्यांहून अधिक म्हणजेच २.४७ टीएमसीपेक्षा अधिक पाणी आले. परिणामी या पाण्याने बुडीत क्षेत्रातील गावांना आपल्या कवेत घेतले.

१६ मे रोजी स्थलांतराच्या नोटिसालेंडी प्रकल्पाकडून हासनाळ प.मू. येथील ग्रामस्थांना १६ मे रोजी स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यात दगडी धरणाची पाणीपातळी ३८८ मीटर राहणार असून, या पातळीला काही गावे बुडीत होऊन बाधित होणार आहेत. त्यामुळे साहित्य, गुरे-ढोरे घेऊन नवे गावठाण या ठिकाणी दिलेल्या भूखंडावर स्थलांतरित व्हावे, असे त्यात नमूद आहे. परंतु त्यानंतरही ग्रामस्थांनी गाव सोडले नव्हते.

टॅग्स :floodपूरNandedनांदेड