शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

गावपातळीवरील ग्राम समित्या कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST

सगरोळी : शेत, शिव, पाणंद व गाव रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी गावपातळीवर गाव रस्ता समिती गठित करण्याचा ...

सगरोळी : शेत, शिव, पाणंद व गाव रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी गावपातळीवर गाव रस्ता समिती गठित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्यापही तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून, गाव रस्ता समिती केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी, शेतमालाला बाजारात पोहोचवण्यासाठी आवश्यक रस्त्याची (पाणंद) कामे पूर्णत्वाला नेण्यासाठी गावपातळीवर गाव समित्या स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य शासनाने घेतला होता. तहसील कार्यालयामार्फत ग्रामपंचायतींना परिपत्रकाद्वारे अशा समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ज्यामध्ये सरपंच अध्यक्ष, तर मंडळाधिकारी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, विकास सोसायटी, प्रगतशील शेतकरी, ग्रामपंचायतच्या महिला सदस्या, ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी, कृषी सहायक अधिकारी, बीट जमादार आदींचा समावेश असलेल्या समितीची नियुक्ती केली जाणार होती; पण गावपातळीवर अशा समित्या अद्याप कागदावरच असून, याबाबत परिपूर्ण अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. गाव, पाणंद, शेत व वहिवाटीखाली असलेले रस्ते मोकळे करणे, तसेच यासंदर्भातील उद्भवणारे वाद गावपातळीवरच मिटविण्याच्या उद्देशाने ग्राम समिती काम करणार होती.

तसेच माती, दगड व मुरूम टाकून रस्त्याचे मजबुतीकरण करणे आदी कामे केली जाणार आहेत; पण अद्याप या समित्या कागदावारच राहिल्या आहेत. रस्त्यासंदर्भात बिलोली तहसील कार्यालयात अनेक तक्रारी, तर पंचायत समितीमध्ये अनेक फायली पडून आहेत. मात्र, तहसील व पंचायत समितीकडून स्थळ पाहणी करून या फायली व तक्रारी तात्काळ निकाली काढाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

कोट

शेतकरी नैसर्गिक संकटाने हैराण झाला आहे. सध्या शेतात जाण्यासाठी असलेल्या वहिवाट, पाणंद, गाव आणि शिवार रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. प्रशासनाने गावपातळीवर समित्यांच्या माध्यमातून रस्ते अतिक्रमणमुक्त करून खुली करून शिव पाणंद रस्ते तात्काळ तयार करावीत.

-परिसरातील शेतकरी

बारड बीएसएनएल ऑफिस कुलूपबंदच

बारड येथील बीएसएनएल ऑफिस कुलूपबंदच असल्याने ग्राहकांना वेळेत सेवा मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. थ्रीजी सेवा नेटवर्क अनेक वेळा गायब असल्याने भ्रमणध्वनी सेवा नेट सेवा विस्कळीत होत आहे, याची तक्रार निवारण करण्यासाठी ऑफिस बंद असल्याने येथील बीएसएनएल ग्राहक अडचणीत येत असतात. याठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी नेमून ऑफिस सेवा सुरळीतपणे मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.