शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

गावपातळीवरील ग्राम समित्या कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST

सगरोळी : शेत, शिव, पाणंद व गाव रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी गावपातळीवर गाव रस्ता समिती गठित करण्याचा ...

सगरोळी : शेत, शिव, पाणंद व गाव रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी गावपातळीवर गाव रस्ता समिती गठित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्यापही तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून, गाव रस्ता समिती केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी, शेतमालाला बाजारात पोहोचवण्यासाठी आवश्यक रस्त्याची (पाणंद) कामे पूर्णत्वाला नेण्यासाठी गावपातळीवर गाव समित्या स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य शासनाने घेतला होता. तहसील कार्यालयामार्फत ग्रामपंचायतींना परिपत्रकाद्वारे अशा समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ज्यामध्ये सरपंच अध्यक्ष, तर मंडळाधिकारी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, विकास सोसायटी, प्रगतशील शेतकरी, ग्रामपंचायतच्या महिला सदस्या, ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी, कृषी सहायक अधिकारी, बीट जमादार आदींचा समावेश असलेल्या समितीची नियुक्ती केली जाणार होती; पण गावपातळीवर अशा समित्या अद्याप कागदावरच असून, याबाबत परिपूर्ण अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. गाव, पाणंद, शेत व वहिवाटीखाली असलेले रस्ते मोकळे करणे, तसेच यासंदर्भातील उद्भवणारे वाद गावपातळीवरच मिटविण्याच्या उद्देशाने ग्राम समिती काम करणार होती.

तसेच माती, दगड व मुरूम टाकून रस्त्याचे मजबुतीकरण करणे आदी कामे केली जाणार आहेत; पण अद्याप या समित्या कागदावारच राहिल्या आहेत. रस्त्यासंदर्भात बिलोली तहसील कार्यालयात अनेक तक्रारी, तर पंचायत समितीमध्ये अनेक फायली पडून आहेत. मात्र, तहसील व पंचायत समितीकडून स्थळ पाहणी करून या फायली व तक्रारी तात्काळ निकाली काढाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

कोट

शेतकरी नैसर्गिक संकटाने हैराण झाला आहे. सध्या शेतात जाण्यासाठी असलेल्या वहिवाट, पाणंद, गाव आणि शिवार रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. प्रशासनाने गावपातळीवर समित्यांच्या माध्यमातून रस्ते अतिक्रमणमुक्त करून खुली करून शिव पाणंद रस्ते तात्काळ तयार करावीत.

-परिसरातील शेतकरी

बारड बीएसएनएल ऑफिस कुलूपबंदच

बारड येथील बीएसएनएल ऑफिस कुलूपबंदच असल्याने ग्राहकांना वेळेत सेवा मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. थ्रीजी सेवा नेटवर्क अनेक वेळा गायब असल्याने भ्रमणध्वनी सेवा नेट सेवा विस्कळीत होत आहे, याची तक्रार निवारण करण्यासाठी ऑफिस बंद असल्याने येथील बीएसएनएल ग्राहक अडचणीत येत असतात. याठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी नेमून ऑफिस सेवा सुरळीतपणे मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.