शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

गावपातळीवरील ग्राम समित्या कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST

सगरोळी : शेत, शिव, पाणंद व गाव रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी गावपातळीवर गाव रस्ता समिती गठित करण्याचा ...

सगरोळी : शेत, शिव, पाणंद व गाव रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी गावपातळीवर गाव रस्ता समिती गठित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्यापही तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून, गाव रस्ता समिती केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी, शेतमालाला बाजारात पोहोचवण्यासाठी आवश्यक रस्त्याची (पाणंद) कामे पूर्णत्वाला नेण्यासाठी गावपातळीवर गाव समित्या स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य शासनाने घेतला होता. तहसील कार्यालयामार्फत ग्रामपंचायतींना परिपत्रकाद्वारे अशा समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ज्यामध्ये सरपंच अध्यक्ष, तर मंडळाधिकारी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, विकास सोसायटी, प्रगतशील शेतकरी, ग्रामपंचायतच्या महिला सदस्या, ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी, कृषी सहायक अधिकारी, बीट जमादार आदींचा समावेश असलेल्या समितीची नियुक्ती केली जाणार होती; पण गावपातळीवर अशा समित्या अद्याप कागदावरच असून, याबाबत परिपूर्ण अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. गाव, पाणंद, शेत व वहिवाटीखाली असलेले रस्ते मोकळे करणे, तसेच यासंदर्भातील उद्भवणारे वाद गावपातळीवरच मिटविण्याच्या उद्देशाने ग्राम समिती काम करणार होती.

तसेच माती, दगड व मुरूम टाकून रस्त्याचे मजबुतीकरण करणे आदी कामे केली जाणार आहेत; पण अद्याप या समित्या कागदावारच राहिल्या आहेत. रस्त्यासंदर्भात बिलोली तहसील कार्यालयात अनेक तक्रारी, तर पंचायत समितीमध्ये अनेक फायली पडून आहेत. मात्र, तहसील व पंचायत समितीकडून स्थळ पाहणी करून या फायली व तक्रारी तात्काळ निकाली काढाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

कोट

शेतकरी नैसर्गिक संकटाने हैराण झाला आहे. सध्या शेतात जाण्यासाठी असलेल्या वहिवाट, पाणंद, गाव आणि शिवार रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. प्रशासनाने गावपातळीवर समित्यांच्या माध्यमातून रस्ते अतिक्रमणमुक्त करून खुली करून शिव पाणंद रस्ते तात्काळ तयार करावीत.

-परिसरातील शेतकरी

बारड बीएसएनएल ऑफिस कुलूपबंदच

बारड येथील बीएसएनएल ऑफिस कुलूपबंदच असल्याने ग्राहकांना वेळेत सेवा मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. थ्रीजी सेवा नेटवर्क अनेक वेळा गायब असल्याने भ्रमणध्वनी सेवा नेट सेवा विस्कळीत होत आहे, याची तक्रार निवारण करण्यासाठी ऑफिस बंद असल्याने येथील बीएसएनएल ग्राहक अडचणीत येत असतात. याठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी नेमून ऑफिस सेवा सुरळीतपणे मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.