शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जिल्ह्यात २०२२पर्यंत चालणार लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST

जिल्ह्यातील ९६ केंद्रांवर सध्या कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आतापर्यंत चार लाख २९ हजार ३६२ नागरिकांना लस देण्यात ...

जिल्ह्यातील ९६ केंद्रांवर सध्या कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आतापर्यंत चार लाख २९ हजार ३६२ नागरिकांना लस देण्यात आली आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरण लसीअभावी राज्यस्तरावरूनच थांबविण्यात आले आहे. ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील एक लाख ४४ हजार १२५ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३१ हजार ५८७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. प्रारंभी शहरातील पाच केंद्रांवर लस देण्यात येत होती. त्यानंतर या केंद्राची संख्या ९६ वर पोहोचली आहे. जिल्ह्याला आतापर्यंत कोविशिल्डचे चार लाख दोन हजार ६३० आणि कोव्हॅक्सिनचे एक लाख १९ हजार ९४० अशा एकूण पाच लाख २२ हजार ५७० लस प्राप्त झाल्या आहेत. त्यातून लसीकरण करण्यात आले आहे.

चौकट----------------

जिल्ह्यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. या वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या मोहिमेत ४५ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य दिले जात आहे. आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील २२ हजार १८६ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस अद्याप देता आलेला नाही.

चौकट-------------

जिल्ह्यात ९४ लसीकरण केंद्र सुरू

जिल्ह्यात प्रारंभी पाच केंद्रांवर लस दिली जात होती. त्यानंतर मनपा हद्दीत आणखी पाच केंद्र वाढविण्यात आली. टप्प्याटप्प्याने उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. आज घडीला ९४ केंद्रांवर लस दिली जात आहे. त्यामध्ये मनपा हद्दीत ११ लसीकरण केंद्र आहेत. या केंद्रांवर दररोज लसीकरण सुरू असून, प्राप्त झालेल्या लसींचा साठा विभागून प्रत्येक केंद्रावर पाठविला जात आहे.

चौकट-------------

जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद लाभत असून, यासाठी प्रशासनाने ग्रामीण भागापर्यंत आरोग्य यंत्रणेमार्फत लसीची आवश्यकतेविषयी जनजागृती केली आहे. प्रारंभी लस उपलब्ध असताना जिल्ह्यात प्रतिदिन १८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. आता लस उपलब्धता कमी झाल्याने प्रतिदिन जिल्ह्यात ३ ते ४ हजार नागरिकांना लस दिली जात आहे. शासनाकडे वेळोवेळी लसींची मागणी केली जात आहे. झालेल्या लसपुरवठ्यातून प्रत्येक केंद्रावर लस पुरवली जात आहे. जितक्या लसी जास्त प्राप्त होतील तेवढे लसीकरण वेगात केले जाईल.

- डॉ. विपीन इटनकर

जिल्हाधिकारी, नांदेड