शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २०२२पर्यंत चालणार लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST

जिल्ह्यातील ९६ केंद्रांवर सध्या कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आतापर्यंत चार लाख २९ हजार ३६२ नागरिकांना लस देण्यात ...

जिल्ह्यातील ९६ केंद्रांवर सध्या कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आतापर्यंत चार लाख २९ हजार ३६२ नागरिकांना लस देण्यात आली आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरण लसीअभावी राज्यस्तरावरूनच थांबविण्यात आले आहे. ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील एक लाख ४४ हजार १२५ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३१ हजार ५८७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. प्रारंभी शहरातील पाच केंद्रांवर लस देण्यात येत होती. त्यानंतर या केंद्राची संख्या ९६ वर पोहोचली आहे. जिल्ह्याला आतापर्यंत कोविशिल्डचे चार लाख दोन हजार ६३० आणि कोव्हॅक्सिनचे एक लाख १९ हजार ९४० अशा एकूण पाच लाख २२ हजार ५७० लस प्राप्त झाल्या आहेत. त्यातून लसीकरण करण्यात आले आहे.

चौकट----------------

जिल्ह्यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. या वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या मोहिमेत ४५ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य दिले जात आहे. आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील २२ हजार १८६ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस अद्याप देता आलेला नाही.

चौकट-------------

जिल्ह्यात ९४ लसीकरण केंद्र सुरू

जिल्ह्यात प्रारंभी पाच केंद्रांवर लस दिली जात होती. त्यानंतर मनपा हद्दीत आणखी पाच केंद्र वाढविण्यात आली. टप्प्याटप्प्याने उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. आज घडीला ९४ केंद्रांवर लस दिली जात आहे. त्यामध्ये मनपा हद्दीत ११ लसीकरण केंद्र आहेत. या केंद्रांवर दररोज लसीकरण सुरू असून, प्राप्त झालेल्या लसींचा साठा विभागून प्रत्येक केंद्रावर पाठविला जात आहे.

चौकट-------------

जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद लाभत असून, यासाठी प्रशासनाने ग्रामीण भागापर्यंत आरोग्य यंत्रणेमार्फत लसीची आवश्यकतेविषयी जनजागृती केली आहे. प्रारंभी लस उपलब्ध असताना जिल्ह्यात प्रतिदिन १८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. आता लस उपलब्धता कमी झाल्याने प्रतिदिन जिल्ह्यात ३ ते ४ हजार नागरिकांना लस दिली जात आहे. शासनाकडे वेळोवेळी लसींची मागणी केली जात आहे. झालेल्या लसपुरवठ्यातून प्रत्येक केंद्रावर लस पुरवली जात आहे. जितक्या लसी जास्त प्राप्त होतील तेवढे लसीकरण वेगात केले जाईल.

- डॉ. विपीन इटनकर

जिल्हाधिकारी, नांदेड