शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

रिक्त पदांमुळे माहूर तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था ढेपाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:19 IST

◼️चोऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक ◼️माहूर तीर्थक्षेत्रासह ५८ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर माहूर : (नितेश बनसोडे) ५८ गावांचे ...

◼️चोऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक

◼️माहूर तीर्थक्षेत्रासह ५८ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

माहूर : (नितेश बनसोडे)

५८ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या पोलीस ठाण्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे माहूर शहरासह ५८ गावांतील कायदा-सुव्यवस्था ढेपाळली आहे.

अनेक गावात हातभट्टी गावठी दारूचे अड्डे यासह अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाले. किरकोळ कारणावरून हाणामारीच्या घटना घडून खून होण्यापर्यंत मजल जात आहे. दत्तमांजरी येथे दोन सख्ख्या भावात झालेल्या हाणामारीत एकाला जीव गमवावा लागला, यावरूनच या बाबीला पुष्टी मिळते.

सण, उत्सव, विविध निवडणुका, राजकीय कार्यक्रम, वर्षभरातील १२ महिन्यांच्या यात्रा, शारदीय नवरात्र महोत्सव, दत्तजयंती, गुरूपौर्णिमा, नारळी पौर्णिमा (परिक्रमा यात्रा), उर्स शरीफ आदींसह माहूर तीर्थक्षेत्रावर दैनंदिन ये-जा करणाऱ्या व्हीआयपी मंडळींची सरबराई करणे व तालुक्यातील माहूर तीर्थक्षेत्रासह ५८ गावांची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी माहूर पोलीस स्टेशनमध्ये मंजूर असलेल्या ४१ पदांपैकी ३० कर्मचारी प्रत्यक्ष पोलीस ठाणे कर्तव्यावर असून बाकीचे इतरत्र कर्तव्यावर संलग्नित करून प्रतिनियुक्तीवर गेल्याने व्यवस्था सांभाळत असताना पोलिसांना कठोर परिश्रम घेऊन कायदा व सुव्यवस्था सांभाळावी लागत आहे. एकेकाळी माहूरला ५९ पदांची मंजुरी होती. नंतरच्या काळात ही संख्या ४१ वर आली असून त्यातील ११ कर्मचारी अद्याप नियुक्त झाले नसल्याने व आधीच मंजूर ३० आणि त्यापैकीही ७ इतर कामात. विशेष बाब म्हणजे विधान परिषद आमदारांनाही अंगरक्षक माहूर पोलीस ठाण्यातूनच. अशी स्थिती असून शहरात काही तणावाचे वातावरण निर्माण होण्याची चुणूक लागल्यास प्रभारी ठाणेदाराची तारांबळ उडत आहे.

पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची गरज

◼️४१ पदांपैकी ३० कर्मचारी प्रत्यक्ष पोलीस ठाण्याला कार्यरत असून व त्यापैकी ६ कर्मचारी इतर ठिकाणी संलग्न, १ प्रतिनियुक्तीवर, १ सीक रजेवर, १ चालक पदावर गुंतल्याने व पोलीस निरीक्षक पद हे गेल्या दोन महिन्यांपासून रिक्तच असल्याने दोन सहायक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, तीन सहायक पोलीस उपनिरीक्षक, चार पोलीस हेड कॉन्स्टेबल, पाच नाइक पोलीस कॉन्स्टेबल, सहा पोलीस कॉन्स्टेबल व दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल अशा एकूण २३ पोलिसांवर जबाबदारी आहे. माहूर शहराचे महत्त्व लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्षम असण्याची नितांत गरज असून पोलीस अधीक्षकांनी तातडीने या गंभीर विषयाकडे लक्ष केंद्रित करून रिक्त पदाचा अनुशेष दूर करावा, अशी मागणी होत आहे.