शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
6
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
7
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
8
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
10
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
11
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
12
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
13
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
14
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
15
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
16
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
17
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
18
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
19
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
20
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

उर्दूघर हे भाषा चळवळीचे केंद्र ठरावे-चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST

पालकमंत्री चव्हाण यांनी उर्दूघराचे उद्‌घाटन आता झाले, त्यानंतर आता नांदेडमधील इदगाह परिसराच्या विकासासाठी आराखडा तयार केला जात असल्याचे सांगितले. ...

पालकमंत्री चव्हाण यांनी उर्दूघराचे उद्‌घाटन आता झाले, त्यानंतर आता नांदेडमधील इदगाह परिसराच्या विकासासाठी आराखडा तयार केला जात असल्याचे सांगितले. अल्पसंख्याक विभागाकडे अल्पसंख्याकाच्या विकासासाठी अनेक योजना आहेत. मात्र त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. अल्पसंख्याक विभागाचे बजेट आता १ हजार कोटी रुपये करावे, अशी मागणी आपण करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अल्पसंख्याक विभागाच्या अप्पर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केल्याची आठवण करुन देताना त्या नांदेडसाठी आणखी निधी देतील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय समारोपात नवाब मलिक यांनी भारतात हिंदीनंतर बोलली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची भाषा उर्दू आहे तर महाराष्ट्रात मराठीनंतर सर्वाधिक वापरली जाणारी भाषा उर्दू असल्याचे ते म्हणाले. उर्दू भाषा लष्करी असली तरीही ती बोलीभाषा पुढे बनली. नांदेडमध्ये झालेल्या उर्दू घराच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणावे. चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांनी उर्दू घराला दिलीपकुमार यांचे नाव देण्याची मागणी केली. यावर बोलताना दिलीपकुमार यांनी उर्दू भाषेतून शिक्षण घेतल्याचे त्यांनी सांगितले. उर्दूसह इंग्रजी, हिंदी आदी भाषावरही त्यांचे प्रभुत्व होते. सामाजिक चळवळीतही त्यांनी चांगले काम केले. त्यांनी दिलीपकुमार यांचे नाव नांदेडच्या उर्दूघरला देण्याची मागणी मान्य केल्याची घोषणा त्यांनी केली.

यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, माजीमंत्री नसीमखान, आमदार मोहन हंबर्डे यांचेही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अभिनेते दिलीपकुमार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने आदींची उपस्थिती होती.

चौकट--------------

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

नांदेडमध्ये मुलींचे वसतिगृह आहे. मुलांसाठी वसतिगृह उभारण्याची मागणी चव्हाण यांनी केली. त्यावेळी मुलांचे वसतिगृह देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. त्याचवेळी ८ लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाईल. मनपा हद्दीत असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्याला ३५ हजार तर जिल्ह्याच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांला ३० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणाही यावेळी नवाब यांनी केली.