शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नांदेड परिमंडळात ‘सौभाग्य’ योजनेतंर्गत १० हजार घरे प्रकाशमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 19:40 IST

‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या नांदेड परिमंडळात ज्या घरांमध्ये अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा १० हजार ६०४ कुटुंबांना वीजजोडणी देवून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्यात आले आहे.

नांदेड : ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या नांदेड परिमंडळात ज्या घरांमध्ये अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा १० हजार ६०४ कुटुंबांना वीजजोडणी देवून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्यात आले आहे.

देशातील नागरिकांना २४ तास वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने २५ सप्टेंबरला २०१७ रोजी  ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थातच ‘सौभाग्य’ योजना सुरू केली. योजनेतंर्गत केवळ शहरच नव्हे, तर दुर्गम आणि अतिदुर्गम भागात राहणाºया शेवटच्या घटकांनाही वीजजोडणी द्यावयाची आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी 'सौभाग्य' योजनेच्या माध्यमातून वीज न पोहोचलेल्या कुटुंबांना त्यांचे विजेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व वीजजोडण्या जुलैअखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने कामे गतीने केली जात आहेत. दरम्यान, ७ जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नांदेड परिमंडळात वीजजोडणीपासून वंचित असलेल्या ८५ हजार ७७७ कुटुंबांपैकी १० हजार ६०४ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली आहे. 

यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील  ५१ हजार २० कुटुंबियांना सदर योजनेअंतर्गत वीजजोडणी देण्यात येणार ओह. आतापर्यंत ४ हजार ५६२ कुटुंबियांचे जीवन प्रकाशमान करण्यात आले आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील २५ हजार ४३२ कुटुंबियांपैकी  २ हजार ३५३ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली. तर परभणी जिल्ह्यातील ९ हजार ३२५ कुटुंबांपैकी ३ हजार ६८९ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली आहे. सदर योजनेतून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत वीजजोडणीसोबतच नऊ वॅटचा एक एलईडी बल्ब आणि एक पिनपॉईंट फिटिंग विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना अवघ्या पाचशे रूपयांमध्ये वीजजोडणी मिळणार असून हे शुल्कही नियमित वीजबिलासोबत दहा समान हप्त्यांत भरावयाचे आहे.

रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार सौभाग्य योजनेअंतर्गत परिमंडळातील प्रत्येक गरिबाच्या घरात वीजजोडणी दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे विजेवरील उपकरणांच्या वापरामुळे जीवन सुकर होवून रोजगारांच्या संधीत वाढ होणार आहे. गोरगरिबांच्या चेहºयांवर हास्य फुलवू शकणारी ही योजना यशस्वी व्हावी, यासाठी  गरजूंनी आपल्या नजीकच्या महावितरण कार्यालयात जावून संपर्क करावा, असे आवाहन महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता संतोष वहाणे यांनी केले आहे.विशेष मोहिमेंतर्गत नांदेड परिमंडळात आतापर्यंत वीज जोडणीपासून वंचित असलेल्या ८५ हजार ७७७ कुटुंबांपैकी  १० हजार ६०४ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.

टॅग्स :Nandedनांदेडmahavitaranमहावितरणelectricityवीजgovernment schemeसरकारी योजना