शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

अवकाळीमुळे तापमानाचा यु टर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:29 IST

गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे यंदा उन्हाळा अधिक तापदायी ठरण्याचे आडाखे बांधणाºया नागरिकांची निसर्गाने फिरकी घेतली़ गेल्या दोन दिवसांत नांदेडसह ग्रामीण भागात सूर्यदर्शन झाले नसून शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ नांदेड शहरातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती़ त्यामुळे तापमान कमालीचे घसरले असून गारठाही वाढला होता़

ठळक मुद्देमार्चमध्ये उघडल्या छत्र्या : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, पिके,फळबागांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे यंदा उन्हाळा अधिक तापदायी ठरण्याचे आडाखे बांधणाºया नागरिकांची निसर्गाने फिरकी घेतली़ गेल्या दोन दिवसांत नांदेडसह ग्रामीण भागात सूर्यदर्शन झाले नसून शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ नांदेड शहरातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती़ त्यामुळे तापमान कमालीचे घसरले असून गारठाही वाढला होता़मार्चच्या पहिल्या आठवड्यात नांदेडचे तापमान ३८ अंशावर गेले होते़ त्यामुळे उन्हाळा सुरु झाल्याचा अनुभव येत होता़ दुपारच्या वेळी रस्त्यावरही शुकशुकाट राहत होता़ कुलरच्या विक्रीतही वाढ झाली होती़ परंतु अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे़ गुरुवारी दिवसभर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही़ त्यानंतर शुक्रवारी सकाळच्या वेळी शहरात शिडकावा झाला़दुपारनंतर मात्र पावसाची सारखी रिपरिप सुरु होती़ रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पाऊस हजेरी लावत होता़ त्यामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली़ तापमानाचा पाराही २४ अशांपर्यंत घसरला होता़ त्यामुळे नांदेडकरांना हुडहुडी भरत होती़शुक्रवार बाजारात उडाली तारांबळगोकुळनगर भागात भरणाºया शुक्रवारच्या बाजारात अचानक आलेल्या पावसामुळे विक्रेते आणि नागरिकाची तारांबळ उडाली़ यावेळी विक्रेत्यांनी मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेतला़ त्यानंतर काही वेळ बाजारात ग्राहकांची वर्दळ सुरु झाली होती़ त्यानंतर अधूनमधून सारखी हजेरी लावलेल्या पावसामुळे अनेक जण बाजाराकडे फिरकलेच नाहीत़ त्यामुळे दिवसभर भाजीपाला घेवून बसलेल्या विक्रेत्यांची मोठी निराशा झाली़जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाची हजेरीमांडवी : गत दोन दिवसांपासून मांडवी भागात सूर्यदर्शन झाले नाही़ शुक्रवारी अधूनमधून चालू असलेल्या रिमझिम पावसाने वातावरणात गारवा वाढलाक़ाढणीस आलेला हरभरा, गहू, ज्वारी इ़ रबी पिकांवर हवामानाचा परिणाम झाला आहे़ गत दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही़बिलोली : गत दोन दिवसांपासून बिलोली व परिसरात सूर्यदर्शन झाले नाही़ शुक्रवारी दुपारी ३ नंतर रिमझिम पाऊस सुरु झाला़ वातावरणातील बदलाने आजारही वाढले आहेत. शेतीची कामे विस्कळीत झाली असून बाजारपेठेतही सामसूम होती़ शुक्रवारी सायंकाळी सर्वदूर पाऊस झाला़कुंटूर : नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरात आज दुसºया दिवशीही अवकाळी पाऊस होवून काही भागात गारपीटही झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. कुंटूर, सालेगाव राहेर, बेळगाव कोकलेगाव, शेळगाव, सांगवी, धनंज, सातेगाव, तालुक्यात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे .गडगा : गडगा व परिसरात शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या़ त्यानंतर सायंकाळी सहा वाजल्यापासून पावसाची रिपरिप चालू आहे. यातच गडग्यासह पाच गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता़ अवकाळीमुळे परिसरातील फळबागांसह पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे़जीव टांगणीला़़़भोकर: मागील दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होवून सततच्या ढगाळ वातावरणासह शुक्रवारी दुपारनंतर रिमझिम पाऊस सुरु झाल्याने शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. दुपारी ३ वाजेनंतर रिमझिम पावसास सुरुवात झाली. साधारणत: एक तास पडून उघडलेल्या पावसाने सायंकाळी ५ वाजता पुन्हा हजेरी लावली. हरभरा पिकाची काढणी झाली असली तरी गहू २२५० हेक्टर, ज्वारी ५५२ हे. मका २२६ हेक्टर क्षेत्रावर असलेले पीक ढगाळ वातावरणामुळे धोक्यात आले आहे़ त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.पिकांचे नुकसानबोंडअळी व त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस,गारपिटीमुळे शेतकºयांना मोठा फटका बसला होता़ त्याची अद्याप भरपाईही करण्यात आली नाही़ तोच पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट दारात येवून उभे राहिले आहे़ गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे हरभरा, गहू, ज्वारीसह हळद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़