शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे तापमानाचा यु टर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:29 IST

गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे यंदा उन्हाळा अधिक तापदायी ठरण्याचे आडाखे बांधणाºया नागरिकांची निसर्गाने फिरकी घेतली़ गेल्या दोन दिवसांत नांदेडसह ग्रामीण भागात सूर्यदर्शन झाले नसून शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ नांदेड शहरातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती़ त्यामुळे तापमान कमालीचे घसरले असून गारठाही वाढला होता़

ठळक मुद्देमार्चमध्ये उघडल्या छत्र्या : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, पिके,फळबागांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे यंदा उन्हाळा अधिक तापदायी ठरण्याचे आडाखे बांधणाºया नागरिकांची निसर्गाने फिरकी घेतली़ गेल्या दोन दिवसांत नांदेडसह ग्रामीण भागात सूर्यदर्शन झाले नसून शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ नांदेड शहरातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती़ त्यामुळे तापमान कमालीचे घसरले असून गारठाही वाढला होता़मार्चच्या पहिल्या आठवड्यात नांदेडचे तापमान ३८ अंशावर गेले होते़ त्यामुळे उन्हाळा सुरु झाल्याचा अनुभव येत होता़ दुपारच्या वेळी रस्त्यावरही शुकशुकाट राहत होता़ कुलरच्या विक्रीतही वाढ झाली होती़ परंतु अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे़ गुरुवारी दिवसभर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही़ त्यानंतर शुक्रवारी सकाळच्या वेळी शहरात शिडकावा झाला़दुपारनंतर मात्र पावसाची सारखी रिपरिप सुरु होती़ रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पाऊस हजेरी लावत होता़ त्यामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली़ तापमानाचा पाराही २४ अशांपर्यंत घसरला होता़ त्यामुळे नांदेडकरांना हुडहुडी भरत होती़शुक्रवार बाजारात उडाली तारांबळगोकुळनगर भागात भरणाºया शुक्रवारच्या बाजारात अचानक आलेल्या पावसामुळे विक्रेते आणि नागरिकाची तारांबळ उडाली़ यावेळी विक्रेत्यांनी मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेतला़ त्यानंतर काही वेळ बाजारात ग्राहकांची वर्दळ सुरु झाली होती़ त्यानंतर अधूनमधून सारखी हजेरी लावलेल्या पावसामुळे अनेक जण बाजाराकडे फिरकलेच नाहीत़ त्यामुळे दिवसभर भाजीपाला घेवून बसलेल्या विक्रेत्यांची मोठी निराशा झाली़जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाची हजेरीमांडवी : गत दोन दिवसांपासून मांडवी भागात सूर्यदर्शन झाले नाही़ शुक्रवारी अधूनमधून चालू असलेल्या रिमझिम पावसाने वातावरणात गारवा वाढलाक़ाढणीस आलेला हरभरा, गहू, ज्वारी इ़ रबी पिकांवर हवामानाचा परिणाम झाला आहे़ गत दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही़बिलोली : गत दोन दिवसांपासून बिलोली व परिसरात सूर्यदर्शन झाले नाही़ शुक्रवारी दुपारी ३ नंतर रिमझिम पाऊस सुरु झाला़ वातावरणातील बदलाने आजारही वाढले आहेत. शेतीची कामे विस्कळीत झाली असून बाजारपेठेतही सामसूम होती़ शुक्रवारी सायंकाळी सर्वदूर पाऊस झाला़कुंटूर : नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरात आज दुसºया दिवशीही अवकाळी पाऊस होवून काही भागात गारपीटही झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. कुंटूर, सालेगाव राहेर, बेळगाव कोकलेगाव, शेळगाव, सांगवी, धनंज, सातेगाव, तालुक्यात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे .गडगा : गडगा व परिसरात शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या़ त्यानंतर सायंकाळी सहा वाजल्यापासून पावसाची रिपरिप चालू आहे. यातच गडग्यासह पाच गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता़ अवकाळीमुळे परिसरातील फळबागांसह पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे़जीव टांगणीला़़़भोकर: मागील दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होवून सततच्या ढगाळ वातावरणासह शुक्रवारी दुपारनंतर रिमझिम पाऊस सुरु झाल्याने शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. दुपारी ३ वाजेनंतर रिमझिम पावसास सुरुवात झाली. साधारणत: एक तास पडून उघडलेल्या पावसाने सायंकाळी ५ वाजता पुन्हा हजेरी लावली. हरभरा पिकाची काढणी झाली असली तरी गहू २२५० हेक्टर, ज्वारी ५५२ हे. मका २२६ हेक्टर क्षेत्रावर असलेले पीक ढगाळ वातावरणामुळे धोक्यात आले आहे़ त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.पिकांचे नुकसानबोंडअळी व त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस,गारपिटीमुळे शेतकºयांना मोठा फटका बसला होता़ त्याची अद्याप भरपाईही करण्यात आली नाही़ तोच पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट दारात येवून उभे राहिले आहे़ गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे हरभरा, गहू, ज्वारीसह हळद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़