शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारचे दोन निर्णय सोयाबीन उत्पादकांच्या मुळावर, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच हजार कोटींना बसू शकतो फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST

केंद्र सरकारने सोयामिल आयात करून व सूर्यफूल सोयाबीनच्या तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने आताच सोयाबीनचे दर तीन ते ...

केंद्र सरकारने सोयामिल आयात करून व सूर्यफूल सोयाबीनच्या तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने आताच सोयाबीनचे दर तीन ते चार हजार रुपयांनी कमी झाले. कधी नव्हे ते सोयाबीनच्या दराने दहा हजारांचा पल्ला ओलांडला होता. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालाच नाही; परंतु येणाऱ्या हंगामामध्ये समाधानकारक भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. दरवर्षी सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ होत आहे. सरासरी प्रतिहेक्टर सहा ते आठ क्विंटल सोयाबीनचा उतारा मिळतो. त्याआधारे जिल्ह्यात २५ लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होत असल्याचे दिसून येते. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सिझनमध्ये क्विंटलमागे किमान दोन ते अडीच हजार रुपयांनी कमी झाले. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच ते साडेपाच हजार कोटी रुपयांचा फटका बसू शकतो.

चौकट...

पोल्ट्री उद्योगात खाद्य तयार करताना १५ टक्के सोयाबीन डीओसी म्हणजे सोयामिल वापरण्यात येतो. देशातील पोल्ट्री उद्योगाला वर्षभरात सोयामिलची १० लाख मेट्रिक टन एवढी गरज आहे. देशांतर्गत सोयाबीनच्या उत्पन्नातून आपली अंदाजे १० लाख मेट्रिक टनाची गरज भागवून आपण निर्यात सुद्धा केली. परंतु, ११ ऑगस्ट २०२१ च्या मत्स्य, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय केंद्रीय मंत्रालयाच्या पत्रांनुसार १५ लाख मेट्रिक टन सोयामिलची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय जाहीर होताच सोयाबीनचे दर घसरले आहेत.

कोट....

या निर्णयाचा फायदा पोल्ट्री उद्योगाला

२० ऑगस्ट रोजी सोयाबीन सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील शुल्क कमी करून शेतकरीविरोधी धोरण राबविले. यावर्षी सोयाबीनच्या दराने दहा हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली, परंतु केंद्राच्या दोन्ही निर्णयांमुळे आताच सोयाबीनचे दर तीन ते चार हजार रुपयांनी कमी झालेत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यावर तर आणखी मोठ्या प्रमाणावर हे दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या गावच्या ग्रामसभेचे ठराव घेऊन केंद्र सरकारला पाठवावेत तसेच खासदारांनी सोयाबीन व सूर्यफुलाच्या तेलावरील आयात शुल्क वाढविण्यासाठी शासनावर दबाव आणण्याची गरज आहे. - प्रल्हाद इंगोले, शेतकरी नेते शिवसेना, नांदेड.