शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारचे दोन निर्णय सोयाबीन उत्पादकांच्या मुळावर, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच हजार कोटींना बसू शकतो फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST

केंद्र सरकारने सोयामिल आयात करून व सूर्यफूल सोयाबीनच्या तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने आताच सोयाबीनचे दर तीन ते ...

केंद्र सरकारने सोयामिल आयात करून व सूर्यफूल सोयाबीनच्या तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने आताच सोयाबीनचे दर तीन ते चार हजार रुपयांनी कमी झाले. कधी नव्हे ते सोयाबीनच्या दराने दहा हजारांचा पल्ला ओलांडला होता. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालाच नाही; परंतु येणाऱ्या हंगामामध्ये समाधानकारक भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. दरवर्षी सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ होत आहे. सरासरी प्रतिहेक्टर सहा ते आठ क्विंटल सोयाबीनचा उतारा मिळतो. त्याआधारे जिल्ह्यात २५ लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होत असल्याचे दिसून येते. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सिझनमध्ये क्विंटलमागे किमान दोन ते अडीच हजार रुपयांनी कमी झाले. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच ते साडेपाच हजार कोटी रुपयांचा फटका बसू शकतो.

चौकट...

पोल्ट्री उद्योगात खाद्य तयार करताना १५ टक्के सोयाबीन डीओसी म्हणजे सोयामिल वापरण्यात येतो. देशातील पोल्ट्री उद्योगाला वर्षभरात सोयामिलची १० लाख मेट्रिक टन एवढी गरज आहे. देशांतर्गत सोयाबीनच्या उत्पन्नातून आपली अंदाजे १० लाख मेट्रिक टनाची गरज भागवून आपण निर्यात सुद्धा केली. परंतु, ११ ऑगस्ट २०२१ च्या मत्स्य, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय केंद्रीय मंत्रालयाच्या पत्रांनुसार १५ लाख मेट्रिक टन सोयामिलची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय जाहीर होताच सोयाबीनचे दर घसरले आहेत.

कोट....

या निर्णयाचा फायदा पोल्ट्री उद्योगाला

२० ऑगस्ट रोजी सोयाबीन सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील शुल्क कमी करून शेतकरीविरोधी धोरण राबविले. यावर्षी सोयाबीनच्या दराने दहा हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली, परंतु केंद्राच्या दोन्ही निर्णयांमुळे आताच सोयाबीनचे दर तीन ते चार हजार रुपयांनी कमी झालेत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यावर तर आणखी मोठ्या प्रमाणावर हे दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या गावच्या ग्रामसभेचे ठराव घेऊन केंद्र सरकारला पाठवावेत तसेच खासदारांनी सोयाबीन व सूर्यफुलाच्या तेलावरील आयात शुल्क वाढविण्यासाठी शासनावर दबाव आणण्याची गरज आहे. - प्रल्हाद इंगोले, शेतकरी नेते शिवसेना, नांदेड.