शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोलामखेड्यातील आदिवासी म्हणतात बाँडपेपरवर लिहून दिले तरच लस घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

माहूर (जि.नांदेड) : तालुक्यातील वाईबाजार कोलामखेड हे आदिवासी पोड असून, या गावातील एकाही नागरिकाने अद्यापपर्यंत लस घेतलेली नाही. ...

माहूर (जि.नांदेड) : तालुक्यातील वाईबाजार कोलामखेड हे आदिवासी पोड असून, या गावातील एकाही नागरिकाने अद्यापपर्यंत लस घेतलेली नाही. आदिवासी बांधवांचा लसीकरणाबाबतचा गैरसमज दूर करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. लस घेतल्यास जिवाचे काही बरेवाईट झाल्यास जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाने जर बाँडपेपरवर लिहून दिले तरच लस घेणार, असा पावित्रा आदिवासी बांधवांनी घेतला आहे.

लसीकरणाची प्रक्रिया सर्वत्र सुरू आहे. शहरी भागात लस मिळत नसल्याची ओरड आहे, तर ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर अल्पप्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील बहुसंख्येने असलेला आदिवासी समाज लसीकरणापासून दूरच आहे. आदिवासी बांधवांचा गैरसमज दूर करण्यासाठी सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी गावात जावून आदिवासी बांधवांचे मन वळविण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याला यश आले नाही. आमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी २२ पोडावर लसीकरण जनजागृती मोहीम राबविली. आदिवासी बांधवांचे मन वळविण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोविडची लस घेतल्यास आपल्याला इतर आजार होतील, लस घेतल्यानंतर जीव जाईल अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. ग्रामीण आदिवासी भागात आजही लसीकरणाची टक्केवारी अत्यल्प आहे. गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे, बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चौहाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी आदिवासी भीमपूर गावात आदिवासी बांधवांचे मन वळविण्यात यश मिळविले. त्यानंतर ५३ आदिवासी बांधवांनी लसीकरण करून घेतले. मात्र दुसऱ्या फेरीत लसीकरणासाठी एकही आदिवासी बांधव समोर आला नाही. माहूर तालुक्यातील वाईबाजार जवळील कोलामखेड मदरसा येथे २८४ लोकसंख्या असून, गोंडखेडी येथे २२४ असे एकूण ५०८ नागरिकांपैकी केवळ आशा वर्कर छाया हुसेन दुमणे यांनीच एकमेव लस घेतली आहे.

चौकट .........

माहूर तालुक्यात १ लाख ९ हजार ४९२ लोकसंख्येपैकी २६ हजार ६३२ नागरिकांनीच लस घेतली आहे. यापैकी पहिली लस २० हजार ३९३ नागरिकांनी, तर दुसरी लस ६ हजार २३९ नागरिकांनी घेतली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे यांनी लस न घेण्यामागचे कारण शोधले असता जिवाचे काही बरेवाईट झाल्यास जबाबदारी कोण घेणार, बाँड पेपरवर तसे लिहून देत असाल तरच आम्ही लस घेऊ, असे नागरिकांनी सांगितले.