शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कोलामखेड्यातील आदिवासी म्हणतात बाँडपेपरवर लिहून दिले तरच लस घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

माहूर (जि.नांदेड) : तालुक्यातील वाईबाजार कोलामखेड हे आदिवासी पोड असून, या गावातील एकाही नागरिकाने अद्यापपर्यंत लस घेतलेली नाही. ...

माहूर (जि.नांदेड) : तालुक्यातील वाईबाजार कोलामखेड हे आदिवासी पोड असून, या गावातील एकाही नागरिकाने अद्यापपर्यंत लस घेतलेली नाही. आदिवासी बांधवांचा लसीकरणाबाबतचा गैरसमज दूर करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. लस घेतल्यास जिवाचे काही बरेवाईट झाल्यास जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाने जर बाँडपेपरवर लिहून दिले तरच लस घेणार, असा पावित्रा आदिवासी बांधवांनी घेतला आहे.

लसीकरणाची प्रक्रिया सर्वत्र सुरू आहे. शहरी भागात लस मिळत नसल्याची ओरड आहे, तर ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर अल्पप्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील बहुसंख्येने असलेला आदिवासी समाज लसीकरणापासून दूरच आहे. आदिवासी बांधवांचा गैरसमज दूर करण्यासाठी सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी गावात जावून आदिवासी बांधवांचे मन वळविण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याला यश आले नाही. आमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी २२ पोडावर लसीकरण जनजागृती मोहीम राबविली. आदिवासी बांधवांचे मन वळविण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोविडची लस घेतल्यास आपल्याला इतर आजार होतील, लस घेतल्यानंतर जीव जाईल अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. ग्रामीण आदिवासी भागात आजही लसीकरणाची टक्केवारी अत्यल्प आहे. गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे, बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चौहाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी आदिवासी भीमपूर गावात आदिवासी बांधवांचे मन वळविण्यात यश मिळविले. त्यानंतर ५३ आदिवासी बांधवांनी लसीकरण करून घेतले. मात्र दुसऱ्या फेरीत लसीकरणासाठी एकही आदिवासी बांधव समोर आला नाही. माहूर तालुक्यातील वाईबाजार जवळील कोलामखेड मदरसा येथे २८४ लोकसंख्या असून, गोंडखेडी येथे २२४ असे एकूण ५०८ नागरिकांपैकी केवळ आशा वर्कर छाया हुसेन दुमणे यांनीच एकमेव लस घेतली आहे.

चौकट .........

माहूर तालुक्यात १ लाख ९ हजार ४९२ लोकसंख्येपैकी २६ हजार ६३२ नागरिकांनीच लस घेतली आहे. यापैकी पहिली लस २० हजार ३९३ नागरिकांनी, तर दुसरी लस ६ हजार २३९ नागरिकांनी घेतली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे यांनी लस न घेण्यामागचे कारण शोधले असता जिवाचे काही बरेवाईट झाल्यास जबाबदारी कोण घेणार, बाँड पेपरवर तसे लिहून देत असाल तरच आम्ही लस घेऊ, असे नागरिकांनी सांगितले.