शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेला धान्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:17 IST

नांदेड : राज्य शासनाने ९ वी ते १२ वी या वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील शाळा सुरू ...

नांदेड : राज्य शासनाने ९ वी ते १२ वी या वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढत आहे. मात्र आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची हजेरी नगण्य असून आदिवासी आश्रमशाळेतील चित्रही असेच आहे. जिल्ह्यात ४४ आश्रमशाळा सुरू असून वसतीगृहे मात्र अद्याप बंदच आहेत. दरम्यान, आदिवासी आश्रमशाळेत धान्य पुरवठा तसेच निधी उपलब्ध होत नसल्याने या ठिकाणचे विद्यार्थी अद्याप घरीच बसून आहेत.

कोरोनामुळे सुरू झालेल्या लाॅकडाऊन काळात सर्वच शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दिवाळीनंतर राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. मात्र समाज कल्याण विभागाच्या आश्रमशाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती २० टक्केच आहे. तर आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थीही आश्रमशाळेत आले नाहीत. काही ठिकाणी अनिवासी आश्रमशाळा सुरू झाल्या आहेत. मात्र निवासी आश्रमशाळेत धान्य पुरवठा होत नसल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अनुदानित आश्रमशाळेला वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने या आश्रमशाळाही अडचणीत आल्या आहेत.

आदिवासी विभागाच्या जिल्ह्यात १६ शासकीय तर १६ अनुदानित आश्रमशाळा आहेत. या ठिकाणी एका शाळेत सरासरी ४०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या आश्रमशाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय नसल्याने या आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

आश्रमशाळांसमोर अडचणी

कोरोनामुळे मागील आठ, नऊ महिन्यापासून बंद असलेल्या आश्रमशाळा सुरू झाल्या असून आदिवासी विभागाच्या आश्रमशाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहाराची सोय होत नसल्याने विद्यार्थी आश्रमशाळेत अद्याप येत नसल्याचे तसेच अनुदानित आश्रमशाळेला निधी मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात समाजकल्याण विभागाच्या इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ४४ आश्रमशाळा असून या आश्रमशाळा शासन निर्णयानुसार कोरोना विषयक सर्व नियम पाळून सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत असून लवकरच आश्रमशाळेतील उपस्थिती शंभर टक्के होईल.

- माळवदकर, समाजकल्याण अधिकारी, नांदेड