शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

पहिल्यांदाच ग्रामपंचायत सदस्यांना सहलीवर नेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:18 IST

नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले असले तरी अद्यापपर्यंत सरपंचपदाच्या आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे पहिल्यांदाच पॅनलप्रमुखांना निवडून आणलेल्या ...

नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले असले तरी अद्यापपर्यंत सरपंचपदाच्या आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे पहिल्यांदाच पॅनलप्रमुखांना निवडून आणलेल्या सदस्यांना सहलीवर न्यावे लागले आहे. त्यात अनेक महिला सदस्य असल्याने त्यांच्या पतीसह त्यांना सहलीवर नेण्याची वेळ पॅनलप्रमुखांना आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकांपूर्वीच झाल्याने अनेक जण सरपंचपदाचे दावेदार होऊन कामालाही लागले होते. दरम्यान, काही ठिकाणी बिनविरोध निवडणुकांच्या नावाखाली सरपंच, उपसरपंचपदासाठी बोली लावण्यात आली. हा एक प्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखा प्रकार असल्याचे आरोप झाले. त्यानंतर शासनाने सरपंच आरक्षण सोडत रद्द करून पुन्हा निवडणुकानंतर आरक्षण सोडत घेतली जाईल, असे जाहीर केले. त्यामुळे सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड झाला. मात्र, सरपंचपद नेमके कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे, याबाबतचा तिढा न सुटल्याने बहुतांश ठिकाणी निवडणूककाळात होणारा अनाठायी खर्च टाळला गेला. तर, काही पॅनलप्रमुखांनी आरक्षण पूर्वीप्रमाणेच राहील, हे गृहीत धरून पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवून बहुमतासाठी आवश्यक तेवढे सदस्य निवडून आणले. परंतु, निवडणूक निकालानंतर अनेक ठिकाणी राखीव असलेल्या जागांचा उमेदवार निवडून आला नाही. परंतु, स्पष्ट बहुमत आले, अशाही घटना घडल्या. त्यामुळे हा पेच आरक्षण सोडतीनंतर सुटू शकतो. त्यामुळे ऐनवेळी कोणाला सरपंच करणार, असा प्रश्न आता गावपुढा-यांना, पॅनलप्रमुखांना पडणार आहे. त्यामुळे सदस्यांना कोणी आश्वासने देऊ नये आणि आपल्याकडे निवडून आलेले सदस्य सरपंच, उपसरपंचपदाच्या लालसेने फुटून दुस-या पार्टीत जाऊ नये, त्यासाठी अनेकांनी निकालापासूनच फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींमध्ये सहा हजार ८२१ सदस्य निवडून देण्यात आले आहेत. त्यातील अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवख्यांना मतदारांनी संधी दिली आहे. त्यामुळे आपण कोणत्याही डावपेचात कमी पडू नये म्हणून आरक्षण सोडत आणि सरपंच निवड कार्यक्रम जोपर्यंत जाहीर होणार नाही, असे नियोजन करून अनेकांनी सदस्य घेऊन सहलीवर जाणे पसंत केले आहे. यापूर्वी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक सहलीवर गेल्याचे ऐकिवात होते. परंतु, सरपंचपदाच्या पेचामुळे सदस्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना सहलीचा आनंद घेता येत आहे.