शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तरुणाच्या खुनात तिघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:29 IST

विष्णूपुरी भागात दारु पिण्यासाठी बसलेल्या चार मित्रांमध्ये झालेल्या भांडणानंतर तिघांनी एकाला जबर मारहाण करीत खंजीरने वार करुन खून केला़ ही घटना २०१७ मध्ये घडली होती़ याप्रकरणी जिल्हा न्या़ व्ही़ के़मांडे यांनी तीन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़

नांदेड : विष्णूपुरी भागात दारु पिण्यासाठी बसलेल्या चार मित्रांमध्ये झालेल्या भांडणानंतर तिघांनी एकाला जबर मारहाण करीत खंजीरने वार करुन खून केला़ ही घटना २०१७ मध्ये घडली होती़ याप्रकरणी जिल्हा न्या़ व्ही़ के़मांडे यांनी तीन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़१२ मार्च २०१७ रोजी विष्णूपुरी परिसरात दुपारी ३ वाजेच्या सुमारास मयत ज्ञानेश्वर बालाजी हंबर्डे याच्यासोबत सुनील भारती (रा़भारतीमठ, गाडीपुरा) व आकाश बालाजी बारसे (रा़विष्णूपुरी) हे दोघे जण दारु पीत बसले होते़ यावेळी त्यांच्या शेजारीच दारु पीत बसलेल्या रामा बळीराम गायकवाड रा़विष्णूपुरी याला ज्ञानेश्वर हंबर्डे याने आमच्यासोबत बस असे म्हणून बोलावून घेतले़ त्यानंतर ज्ञानेश्वरने रामाला तू श्याम मराठे याला का मारहाण केली, असे म्हणून वाद घातला़ त्यानंतर ज्ञानेश्वर याने रामाला मारहाण करण्यास सुरुवात केली़ हा प्रकार पाहून रामा आणि सुनील याने ज्ञानेश्वर हा नेहमी दारु पिऊन आपल्याला मारहाण करतो़ त्याला एकदाची अद्दल घडवू असे म्हणत त्यांनी ज्ञानेश्वरला मारहाण करण्यास सुरुवात केली़सुनीलने जवळील चाकू काढला़ परंतु, झटापटीत तो खाली पडला़ यावेळी रामा याने तो चाकू उचलून ज्ञानेश्वरवर वार केले़ त्यात ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला़ या प्रकरणी भास्कर बालाजी हंबर्डे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविला़ फौजदार पीक़े़मराडे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले़न्यायालयाने या प्रकरणात नऊ साक्षीदार तपासले़ त्यानंतर न्या़व्हीक़े़मांडे यांनी रामा गायकवाड, सुनील भारती आणि आकाश बारसे या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ सरकारच्या वतीने अ‍ॅड़संजय लाठकर यांनी बाजू मांडली़आरोपीने पोलिसाला केली होती मारहाणखुनाच्या प्रकरणाची नांदेड न्यायालयात सुनावणी सुरु असताना पालीस तिन्ही आरोपींना घेवून कोर्टात आले होते़ यावेळी जेवणाच्या कारणावरुन आरोपीने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगाविली होती़ या प्रकरणात आरोपींच्या विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालयMurderखून