शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मराठवाड्यातील १,३४४ गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 03:47 IST

आॅक्टोबरमध्येच मराठवाड्याच्या ७६ तालुक्यांतील १,३४४ गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

नांदेड : आॅक्टोबरमध्येच मराठवाड्याच्या ७६ तालुक्यांतील १,३४४ गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जानेवारीपर्यंत आणखी १,१६८ गावे तर एप्रिलमध्ये १,८७३ गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भूजल आणि विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणात मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता समोर आली आहे.मराठवाड्यातील ७६ पैकी १२ तालुक्यांत सरासरीच्या ० ते २० टक्क्यांहून कमी पाऊस झालेला आहे. २० ते ३० टक्क्यांहून कमी पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या १२ आहे. ३० ते ५० टक्क्यांहून कमी पर्जन्यमान झालेले तालुके ४० आहेत. ७ तालुक्यांत ५० टक्क्यांहून कमीपाऊस झाला आहे. त्यात बीड, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे.विभागातील ४ हजार ५७२ गावांतील भूजलपातळी १ मीटरपेक्षा अधिक घटली आहे, तर १ हजार ९४८ गावांतील भूजलपातळीत १ ते २ मीटरची घट झाली आहे. २ ते ३ मीटर घट झालेल्या गावांची संख्या१,२१३ आहे.विशेष म्हणजे तब्बल १,४११ गावांत भूजलपातळीत ३ मीटरहून अधिक घट झाल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. ६७ गावांमधील भूजलसाठा चिंताजनक स्तरावरआहे.>प्रशासनाकडून मराठवाड्याची कोंडी?प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर मराठवाड्याची चोहोबाजूंनी कोंडी सुरू आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला रेखांकन मंजुरीसाठी २५०० कोटींच्या अनुदानाची गरज आहे. दुसरीकडे समन्यायी पाणी वाटपाचा अजून निर्णय झालेला नाही. कालवा दुरूस्ती, शेतापर्यंत पाणी देण्याची व्यवस्था करणे, पाणी वापर संस्थांची हद्द ठरविण्यासाठी अनुदानाची गरज आहे.