शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

मराठवाड्यातील १,३४४ गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 03:47 IST

आॅक्टोबरमध्येच मराठवाड्याच्या ७६ तालुक्यांतील १,३४४ गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

नांदेड : आॅक्टोबरमध्येच मराठवाड्याच्या ७६ तालुक्यांतील १,३४४ गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जानेवारीपर्यंत आणखी १,१६८ गावे तर एप्रिलमध्ये १,८७३ गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भूजल आणि विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणात मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता समोर आली आहे.मराठवाड्यातील ७६ पैकी १२ तालुक्यांत सरासरीच्या ० ते २० टक्क्यांहून कमी पाऊस झालेला आहे. २० ते ३० टक्क्यांहून कमी पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या १२ आहे. ३० ते ५० टक्क्यांहून कमी पर्जन्यमान झालेले तालुके ४० आहेत. ७ तालुक्यांत ५० टक्क्यांहून कमीपाऊस झाला आहे. त्यात बीड, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे.विभागातील ४ हजार ५७२ गावांतील भूजलपातळी १ मीटरपेक्षा अधिक घटली आहे, तर १ हजार ९४८ गावांतील भूजलपातळीत १ ते २ मीटरची घट झाली आहे. २ ते ३ मीटर घट झालेल्या गावांची संख्या१,२१३ आहे.विशेष म्हणजे तब्बल १,४११ गावांत भूजलपातळीत ३ मीटरहून अधिक घट झाल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. ६७ गावांमधील भूजलसाठा चिंताजनक स्तरावरआहे.>प्रशासनाकडून मराठवाड्याची कोंडी?प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर मराठवाड्याची चोहोबाजूंनी कोंडी सुरू आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला रेखांकन मंजुरीसाठी २५०० कोटींच्या अनुदानाची गरज आहे. दुसरीकडे समन्यायी पाणी वाटपाचा अजून निर्णय झालेला नाही. कालवा दुरूस्ती, शेतापर्यंत पाणी देण्याची व्यवस्था करणे, पाणी वापर संस्थांची हद्द ठरविण्यासाठी अनुदानाची गरज आहे.